शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

इचलकरंजीत लसीकरण केंद्रांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ११ ते १६ मेपर्यंत जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ११ ते १६ मेपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय जाहीर केला. तसेच लसीकरणाचा पुरवठा कमी होत असल्याने शासकीय सहा केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची केंद्रांवर गर्दी होत आहे. लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांची गर्दी आटोक्यात आणण्याच्यादृष्टीने शहर सनियंत्रण समितीने शहरात जनता कर्फ्यू लागू केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्यामुळे उपलब्ध केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. सकाळपासूनच अनेकजण केंद्रावर रांगेत उभे राहत आहेत. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

इचलकरंजी शहराची लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत प्रशासन एकीकडे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे, दुसरीकडे लसीकरण केंद्रांची संख्या कमी करत आहे. मोजक्याच केंद्रांवर लस उपलब्ध असल्याने गर्दी निर्माण होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणत लसींचा पुरवठा कमी होत आहे. जेवढे डोस उपलब्ध असतील, त्या प्रमाणात केंद्रास वाटप केले जाते. सध्या लस कमी मिळत असल्यामुळे केंद्रांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पुरवठा वाढल्यास पुन्हा केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.