शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सकाळी गर्दी, संध्याकाळी सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ ...

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी सात ते अकरा यावेळेत जीवनावश्यक वस्तू, भाजी मंडई सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, या वस्तू खरेदीच्या नावावर सकाळच्या वेळी मोठी गर्दी व्हायला लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी गेल्या सोमवारपासून शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याच्या तसेच जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांतून फक्त घरपोच सेवा देण्याबरोबर रस्त्यावर कोणीही व्यवहार करणार नाही, अशा सूचना दिल्या.

काही दिवस या सूचनांची अंमलबजावणी झाली, पण रस्त्यांवर पुन्हा गर्दी व्हायला सुरवात झाली. रविवारी तर गर्दीने परिसीमा गाठली. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर येऊन बसले. दुकाने सुरू झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या दारात नागरिकांच्या रांगा लागल्या. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने फळ विक्रेत्यांच्या गाड्यांवर मोठी गर्दी झाली. उपनगरांतील नर्सरीसुद्धा सुरू होत्या. साडेअकरानंतर हळूहळू व्यवहार बंद व्हायला लागले. फळांच्या गाड्या तर दुपारपर्यंत सुरूच होत्या. दुपारनंतर मात्र शहरात सन्नाटा पसरला.

नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी महापालिकेला सुटी असल्याने कर्मचारी दिसले नाहीत, परंतु पोलिसांनी मात्र दुपारनंतर सर्व व्यवहार बंद करून रस्ते मोकळे केले.

शहरात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज संख्या वाढत असताना नागरिक मात्र अगदी बिनधास्त शहरात वावरत आहेत. भाजीमंडईत रविवारी सोशल डिस्टंन्सचा पार फज्जा उडाला होता. नागरिक एकमेकांना खेटून भाज्या खरेदी करत होते. इब्राहिम खाटिक चौकात तर पुढे जायला वाट मिळत नव्हती. फेरीवाले, पार्किंग केलेली वाहने, बाहेरून आलेली वाहने यामुळे नागरिकाना या गर्दीतूनच पुढे सरकावे लागत होते. एकंदरीत कोरोना गेल्याचेच चित्र होते.