शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी गर्दी, संध्याकाळी सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ ...

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी सात ते अकरा यावेळेत जीवनावश्यक वस्तू, भाजी मंडई सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, या वस्तू खरेदीच्या नावावर सकाळच्या वेळी मोठी गर्दी व्हायला लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी गेल्या सोमवारपासून शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याच्या तसेच जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांतून फक्त घरपोच सेवा देण्याबरोबर रस्त्यावर कोणीही व्यवहार करणार नाही, अशा सूचना दिल्या.

काही दिवस या सूचनांची अंमलबजावणी झाली, पण रस्त्यांवर पुन्हा गर्दी व्हायला सुरवात झाली. रविवारी तर गर्दीने परिसीमा गाठली. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर येऊन बसले. दुकाने सुरू झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या दारात नागरिकांच्या रांगा लागल्या. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने फळ विक्रेत्यांच्या गाड्यांवर मोठी गर्दी झाली. उपनगरांतील नर्सरीसुद्धा सुरू होत्या. साडेअकरानंतर हळूहळू व्यवहार बंद व्हायला लागले. फळांच्या गाड्या तर दुपारपर्यंत सुरूच होत्या. दुपारनंतर मात्र शहरात सन्नाटा पसरला.

नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी महापालिकेला सुटी असल्याने कर्मचारी दिसले नाहीत, परंतु पोलिसांनी मात्र दुपारनंतर सर्व व्यवहार बंद करून रस्ते मोकळे केले.

शहरात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज संख्या वाढत असताना नागरिक मात्र अगदी बिनधास्त शहरात वावरत आहेत. भाजीमंडईत रविवारी सोशल डिस्टंन्सचा पार फज्जा उडाला होता. नागरिक एकमेकांना खेटून भाज्या खरेदी करत होते. इब्राहिम खाटिक चौकात तर पुढे जायला वाट मिळत नव्हती. फेरीवाले, पार्किंग केलेली वाहने, बाहेरून आलेली वाहने यामुळे नागरिकाना या गर्दीतूनच पुढे सरकावे लागत होते. एकंदरीत कोरोना गेल्याचेच चित्र होते.