शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

सकाळी गर्दी, संध्याकाळी सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ ...

गेल्या महिन्याच्या १४ तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी सात ते अकरा यावेळेत जीवनावश्यक वस्तू, भाजी मंडई सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, या वस्तू खरेदीच्या नावावर सकाळच्या वेळी मोठी गर्दी व्हायला लागली. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी गेल्या सोमवारपासून शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याच्या तसेच जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांतून फक्त घरपोच सेवा देण्याबरोबर रस्त्यावर कोणीही व्यवहार करणार नाही, अशा सूचना दिल्या.

काही दिवस या सूचनांची अंमलबजावणी झाली, पण रस्त्यांवर पुन्हा गर्दी व्हायला सुरवात झाली. रविवारी तर गर्दीने परिसीमा गाठली. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावर येऊन बसले. दुकाने सुरू झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या दारात नागरिकांच्या रांगा लागल्या. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने फळ विक्रेत्यांच्या गाड्यांवर मोठी गर्दी झाली. उपनगरांतील नर्सरीसुद्धा सुरू होत्या. साडेअकरानंतर हळूहळू व्यवहार बंद व्हायला लागले. फळांच्या गाड्या तर दुपारपर्यंत सुरूच होत्या. दुपारनंतर मात्र शहरात सन्नाटा पसरला.

नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी महापालिकेला सुटी असल्याने कर्मचारी दिसले नाहीत, परंतु पोलिसांनी मात्र दुपारनंतर सर्व व्यवहार बंद करून रस्ते मोकळे केले.

शहरात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची रोज संख्या वाढत असताना नागरिक मात्र अगदी बिनधास्त शहरात वावरत आहेत. भाजीमंडईत रविवारी सोशल डिस्टंन्सचा पार फज्जा उडाला होता. नागरिक एकमेकांना खेटून भाज्या खरेदी करत होते. इब्राहिम खाटिक चौकात तर पुढे जायला वाट मिळत नव्हती. फेरीवाले, पार्किंग केलेली वाहने, बाहेरून आलेली वाहने यामुळे नागरिकाना या गर्दीतूनच पुढे सरकावे लागत होते. एकंदरीत कोरोना गेल्याचेच चित्र होते.