शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

जिल्ह्यात पीक पाणी चांगले, दुबार पेरणीचे संकट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी ...

कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी व ढगाळ वातावरणामुळे पीक पाणी उत्तम आहे. त्यामुळे जिल्हा दुबार पेरणीपासून कोसो दूर आहे. आहे ती पिके पावसाने उघडीप दिल्याने बऱ्यापैकी तरारली असून आंतरमशागतीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकरी समाधानी आहे.

राज्यभर माॅन्सूनने विश्रांती घेतल्याने दुबार पेरणीच्या संदर्भात कृषिविभागाने नजरअंदाज पाहणी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने तालुकानिहाय आढावा घेतला असता, सध्यस्थितीत कोठेही दुबार पेरणीची शक्यता नसल्याचा अहवाल आला आहे. सलग पाच-सहा दिवस पाऊस पडल्याने आणि पुरात पिके अडकल्याने काहीसे नुकसान झाले आहे पण त्यानंतर ऊन पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

जिल्ह्यात आजच्या घडीला ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र तरवे लागण जास्त पाऊस नसल्याने अद्याप फारशी वेगाने होत नसल्याने ही अजून २५ टक्केवरील पेरा शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. नाचणीचा पेरा अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. याशिवाय ज्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत, त्या विशेषता आडसाली लागणीच्या आहेत.

प्रतिक्रिया

तालुकापातळीवर कृषी अधिकारी व सहायकांकडून घेतलेल्या अहवालानुसार सध्या दुबार पेरणीची कोणतीही शक्यता नाही.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

चौकट

ढगाळ वातावरण, हलकासा शिडकावा

रविवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले असून हलकासा शिडकावा सोडला तर पावसाने हुलकावणीच दिली आहे. ढग भरुन येत आहेत, पण मोठा पाऊस पडलेला नाही. हवेत मात्र कमालीचा गारवा आहे. हवामान विभागाने देखील असेच अंशता ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.