शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जिल्ह्यात पीक पाणी चांगले, दुबार पेरणीचे संकट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी ...

कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी व ढगाळ वातावरणामुळे पीक पाणी उत्तम आहे. त्यामुळे जिल्हा दुबार पेरणीपासून कोसो दूर आहे. आहे ती पिके पावसाने उघडीप दिल्याने बऱ्यापैकी तरारली असून आंतरमशागतीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकरी समाधानी आहे.

राज्यभर माॅन्सूनने विश्रांती घेतल्याने दुबार पेरणीच्या संदर्भात कृषिविभागाने नजरअंदाज पाहणी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने तालुकानिहाय आढावा घेतला असता, सध्यस्थितीत कोठेही दुबार पेरणीची शक्यता नसल्याचा अहवाल आला आहे. सलग पाच-सहा दिवस पाऊस पडल्याने आणि पुरात पिके अडकल्याने काहीसे नुकसान झाले आहे पण त्यानंतर ऊन पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

जिल्ह्यात आजच्या घडीला ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र तरवे लागण जास्त पाऊस नसल्याने अद्याप फारशी वेगाने होत नसल्याने ही अजून २५ टक्केवरील पेरा शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. नाचणीचा पेरा अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. याशिवाय ज्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत, त्या विशेषता आडसाली लागणीच्या आहेत.

प्रतिक्रिया

तालुकापातळीवर कृषी अधिकारी व सहायकांकडून घेतलेल्या अहवालानुसार सध्या दुबार पेरणीची कोणतीही शक्यता नाही.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

चौकट

ढगाळ वातावरण, हलकासा शिडकावा

रविवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले असून हलकासा शिडकावा सोडला तर पावसाने हुलकावणीच दिली आहे. ढग भरुन येत आहेत, पण मोठा पाऊस पडलेला नाही. हवेत मात्र कमालीचा गारवा आहे. हवामान विभागाने देखील असेच अंशता ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.