शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात पीक पाणी चांगले, दुबार पेरणीचे संकट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी ...

कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी व ढगाळ वातावरणामुळे पीक पाणी उत्तम आहे. त्यामुळे जिल्हा दुबार पेरणीपासून कोसो दूर आहे. आहे ती पिके पावसाने उघडीप दिल्याने बऱ्यापैकी तरारली असून आंतरमशागतीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकरी समाधानी आहे.

राज्यभर माॅन्सूनने विश्रांती घेतल्याने दुबार पेरणीच्या संदर्भात कृषिविभागाने नजरअंदाज पाहणी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने तालुकानिहाय आढावा घेतला असता, सध्यस्थितीत कोठेही दुबार पेरणीची शक्यता नसल्याचा अहवाल आला आहे. सलग पाच-सहा दिवस पाऊस पडल्याने आणि पुरात पिके अडकल्याने काहीसे नुकसान झाले आहे पण त्यानंतर ऊन पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

जिल्ह्यात आजच्या घडीला ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र तरवे लागण जास्त पाऊस नसल्याने अद्याप फारशी वेगाने होत नसल्याने ही अजून २५ टक्केवरील पेरा शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. नाचणीचा पेरा अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. याशिवाय ज्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत, त्या विशेषता आडसाली लागणीच्या आहेत.

प्रतिक्रिया

तालुकापातळीवर कृषी अधिकारी व सहायकांकडून घेतलेल्या अहवालानुसार सध्या दुबार पेरणीची कोणतीही शक्यता नाही.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

चौकट

ढगाळ वातावरण, हलकासा शिडकावा

रविवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले असून हलकासा शिडकावा सोडला तर पावसाने हुलकावणीच दिली आहे. ढग भरुन येत आहेत, पण मोठा पाऊस पडलेला नाही. हवेत मात्र कमालीचा गारवा आहे. हवामान विभागाने देखील असेच अंशता ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.