शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

गळीत हंगाम आॅक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:41 IST

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू करावा लागेल, असे निर्देश पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी गुरुवारी कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उसाचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच उसाचा गाळप हंगाम सुरू करावा लागेल, असे निर्देश पुणे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी गुरुवारी कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्रधान कार्यालयात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या शेती अधिकाºयांची बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ, कार्यालयीन अधीक्षक रमेश बारडे, लेखापरीक्षक विजय पाटील, विभागीय कृषी अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, आदींची होती.साखर आयुक्तालयाचे सहसंचालक डी. आय. गायकवाड यांनी दोन टप्प्यांत शेती अधिकाºयांसोबत बैठक घेऊन ऊस उत्पादनाबाबत माहिती घेतली. यावर जवळपास सर्वच अधिकाºयांनी यंदा उसाचे बंपर उत्पादन होणार असल्याचे सांगितले.गतवर्षी कोल्हापूर व सांगलीमध्ये २१३.२७ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १३७.९८ लाख टन व सांगली जिल्ह्यातील ८०.२९ लाख टन गाळप झाले होते. त्या तुलनेत यंदा म्हणजे २०१८-१९ साठी १३७.९४ लाख टन कोल्हापूर जिल्ह्यात व ८९.८१ लाख टन सांगली जिल्ह्यात असे मिळून २२७.८५ लाख टन ऊस उत्पादन होणार आहे.गतवर्षीच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात ९.६२ लाख टन व कोल्हापूर जिल्ह्यात ४.९६ मेट्रिक टन असे १४.५८ लाख टन उत्पादन वाढले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने ऊस गळीत हंगाम आॅक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरू करावा, असे निर्देश सर्व शेती अधिकाºयांना दिले, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.यंदा ऊसतोडणी यंत्रांवर भरमराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, आदी भागांतील ऊसतोडणी मजूर यावर्षी येण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त हार्वेस्टर (ऊसतोडणी यंत्र)चा वापर करण्याची गरज आहे. सध्या कारखान्यांकडे २५२ हार्वेस्टर उपलब्ध असून ३००ची मागणी करण्यात आली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.