शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

अपंग-अव्यंग विवाहास चालना मिळणार

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी : संसारोपयोगी साहित्यासह खर्चासाठी ५० हजार रुपये

महेश आठल्ये - म्हासुर्लीअपंग व्यक्तीशी अपंग नसणाऱ्या व्यक्तींनी विवाह करावा यासाठी प्रोत्साहन म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अर्थसाहाय्य देण्याची योजना आखली आहे. आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर प्रोत्साहन देण्यासाठी अपंग व अव्यंग जोडप्याने विवाह केल्यास रोख रक्कम, बचत प्रमाणपत्र, संसारोपयोगी साहित्य व स्वागत समारंभ असे एकूण ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंग नसलेल्या सदृढ व्यक्तीने विवाह केल्यासच या योजनेचा लाभ मिळणार आहे.अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे तसेच विवाहास आर्थिक मदत व्हावी यादृष्टीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ज्या पद्धतीने आर्थिक साहाय्य दिले जाते त्याप्रमाणे अपंग व अपंगत्व नसलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अपंग व अव्यंग विवाहास चालना मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ४०टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असलेल्या वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू-वराशी विवाह केल्यास अर्थसाहाय्य केले जाणार असून त्यामध्ये २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, रोख रक्कम २० हजार रुपये, संसारोपयोगी साहित्यासाठी ४५०० रुपये, तर स्वागत समारंभासाठी ५०० रुपये असे एकूण ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या वधू अथवा वराने अपंगत्वाचे सक्षम अधिकाऱ्याने (सक्षम व्यक्तीने) दिलेले प्रमाणपत्र असावे. दोघांपैकी एकजण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वर अथवा वधूचा प्रथम विवाह असावा. घटस्फोटित असल्यास पूर्वी मदत घेतलेली नसावी.