शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

हिरण्यकेशी प्रदूषित करणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: April 30, 2015 00:31 IST

गडहिंग्लज पंचायत समिती सभा : बाळेश नाईक यांनी सभागृहाचे कामकाज रोखले

गडहिंग्लज : मळी मिश्रित पाणी व सांडपाणी हिरण्यकेशी नदीत सोडून पाणी प्रदूषित करणाऱ्या संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यावर व गडहिंग्लज नगरपालिकेवर फौजदारी करावी, अशी आग्रही मागणी विरोधी जनता दलाचे सदस्य बाळेश नाईक यांनी बुधवारी केली. याप्रश्नी आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी काही काळ सभागृहाचे कामकाज रोखून धरले.सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा झाली. पाटबंधारे खात्याच्या आढावावेळी बाटलीतून आणलेले हिरण्यकेशीचे गढूळ पाणी सभापतींच्या टेबलावर ठेवून नाईक यांनी हा प्रश्न लावून धरला.नदीतील पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर पाटबंधारे खाते काय कारवाई करणार ? याबाबत ठोस उत्तर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांच्यासह उपस्थित सर्व महिला सदस्यांनीही त्यांच्या मागणीला दुजोरा दिला.सुरूवातीला पाटबंधारे खात्याचे अधिकारी सभेला उपस्थित नव्हते. या खात्याकडून आलेली टिप्पणी सभा कामकाज लिपिक राणे यांनी वाचून दाखवायला सुरूवात केली. त्यास नाईक यांनी जोरदार आक्षेप घेतला. गडहिंग्लज शहरासह पूर्वभागात पाणी प्रदूषणाचा विषय गाजत आहेत. याप्रश्नी आंदोलन सुरू असतानाही पाटबंधारे खात्याला त्याचे गांभीर्य नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहून उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.सभापती सुतार व सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी भ्रमनध्वनीवरून पाटबंधारे शाखा अभियंता नाडकर्णी यांना बोलावून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस गेल्यामुळे या सभेला उपस्थित राहण्यास विलंब झाल्याचा खुलासा करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरच कामकाजाला सुरूवात झाली. नाडकणी यांच्यावरही नाईकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यावेळी प्रदूषणाच्या प्रश्नावर कारवाईसाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ही स्वतंत्र यंत्रणा असून, कारवाईची बाब खात्याच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तथापि, चित्रीच्या लाभक्षेत्रातील निलजी बंधाऱ्यापर्यंत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. याच नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. नदीचे पाणीच प्रदूषित झाल्यामुळे पूर्वभागातील अनेक खेड्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तेरणीच्या तलावातून पाणी उपसण्यास हलकर्णीसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना परवानगी द्यावी, अशी मागणी नाईकांनी केली. त्यास नाडकर्णी यांनी सहमती दर्शविली.सभेस सदस्या मीना पाटील, स्नेहल गलगले, सरिता पाटील व रजनी नाईक यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सभेनंतर नांगनूर बंधाऱ्याची संयुक्त पाहणीहिरण्यकेशी प्रदूषणाच्या प्रश्नावरील चर्चेत नाईक यांनी सभा संपल्यानंतर सभापती व संबंधित अधिकाऱ्यांनी नांगनूर बंधाऱ्याला भेट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सभापती सुतार व सहायक गटविकास अधिकारी जगदाळे, पाटबंधारे शाखाअभियंता नाडकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी, पंचायत अधिकारी माळी यांनी नांगनूर बंधाऱ्याला भेट देऊन त्या परिसरातील हिरण्यकेशीच्या पाण्याची पाहणी केली.