शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत; अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:39 IST

कोल्हापूर : अन्यायकारक कृषीविरोधात आंदाेलन करीत असलेल्या आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष ...

कोल्हापूर : अन्यायकारक कृषीविरोधात आंदाेलन करीत असलेल्या आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. सर्व शेती व्यवसाय भांडवलदारांच्या घशात जाणार आहे. त्यामुळे २५० शेतकरी संघटनांची मिळून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली. देशभरातील शेतकरी हे काळे कायदे सरकारने मागे घ्यावेत, यासाठी दिल्लीला घेराव घालण्यासाठी आगेकूच करीत आहेत. त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करून केंद्र सरकार हे आंदोलन मोडून काढू पाहत आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलने होऊनदेखील तेथील कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद झालेले नाहीत; पण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्रासपणे गुन्हे नोंद होत आहेत. यापुढेदेखील १५ ते २२ डिसेंबरपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचे या कायद्यांसंदर्भात जनजागरण करण्यासाठी जिल्हाभर शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा काढणार असून २५२ सभा जिल्हाभर होणार आहेत. तरी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे नोंद थांबविण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत व नोंद झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश द्यावेत.

यावेळी सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, वसंतराव पाटील, बाबासाहेब देवकर, संभाजीराव जगदाळे, बी. एल. बर्गे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, नामदेव पाटील, दिलदार मुजावर, अशोक चौगुले उपस्थित होते.

---

फोटो नं १११२२०२०-कोल-किसान संघर्ष समिती

फोटो ओळ : कोल्हापुरात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शुक्रवारी शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना दिले.

----

इंदुमती गणेश