शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कोल्हापूर जिल्ह्यात ४८ संस्थांत ७५ कोटींचा अपहार तीनशेहून अधिक जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:42 IST

‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ४८ सहकारी संस्थांमध्ये तब्बल ७५ कोटींचा अपहार झाला आहे.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ४८ सहकारी संस्थांमध्ये तब्बल ७५ कोटींचा अपहार झाला आहे. यामध्ये बॅँका, पतसंस्था व विकाससंस्थांची संख्या लक्षणीय असून, या संस्थांशी संलग्न ३०० हून अधिक जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. लेखापरीक्षकांकडून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले; पण वसुलीची प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी सहकाराची चळवळ राज्यात बळकट केली; पण खºया अर्थाने कोल्हापुरातील कर्तृत्ववान नेतृत्वामुळे येथे सहकार रुजला आणि फोफावलाही. सहकारामुळे विशेषत: साखर कारखाना, दूध संघ, विकास संस्था, पतसंस्थांमुळे जिल्ह्याचे अर्थकारण भक्कम झाले. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उभे करण्याचे काम सहकाराने केले, हे कोणीही नाकारू शकत नाही; पण सहकारात ‘स्वाहा’कार घुसल्याने अनेक वित्तीय संस्था डबघाईला आल्या. अपहारामुळे संस्था अडचणीत आल्या.

लेखापरीक्षणात अपहार उघडकीस आल्यानंतर लेखापरीक्षकांनी तत्काळ निबंधकांची मान्यता घेऊन गुन्हा नोंद करायचा असतो; पण अनेकवेळा लेखापरीक्षकच गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करतात. एस. के. पाटील बॅँकेच्या बाबतीत असेच घडले. अपहार स्पष्ट झाला; पण संचालकांवर कारवाई करण्याबाबत लेखापरीक्षकांनी कानाडोळा केला. ठेवीदार संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले.

गेल्या पाच वर्षांत शंभरहून अधिक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे झाले; पण त्यांतील अपहाराची रक्कम न भरल्याने ४८ संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या ४८ संस्थांमध्ये सर्वाधिक चार वेळा शेतकरी संघाच्या विविध शाखांमध्ये कर्मचाºयांनी अपहार केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. गडहिंग्लजच्या शिवाजी बॅँकेच्या संचालकांवर १३ कोटी ३१ लाखांच्या अपहाराबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. अलीकडेच एस. के. पाटील बॅँकेच्या संचालकांवर१७ कोटींच्या अपहाराबद्दल गुन्हे दाखल केले आहेत.मोठा अपहार आर्थिक गुन्हे अन्वेषणकडेतीन कोटींपर्यंत अपहार असेल तर संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करता येतात; पण त्यापेक्षा जास्त अपहार असेल तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अभिप्राय घ्यावा लागतो.शेतकरी संघात सर्वाधिक अपहारगेल्या पाच वर्षांत शेतकरी संघाच्या चार शाखांत अपहार झालेले आहेत. ‘नर्सरी’, ‘टिंबर मार्केट’, ‘पडळ’ या शाखांत आतापर्यंत नऊ लाख ८५ हजारांचा अपहार झाला आहे.संबंधित कर्मचाºयांवर गुन्हेही दाखल झालेले आहेत.

पाच वर्षांतील अपहार झालेल्या संस्थांची संख्याप्रमुख संस्था (कंसात अपहाराची रक्कम )शेतकरी संघ नर्सरी शाखा (८२ हजार ६७५ रुपये),टिंबर मार्केट शाखा (३ लाख ५५ हजार)रत्नाप्पाण्णा कुंभार हौसिंग (६ लाख ९८ हजार)एस. के. पाटील बॅँक (१७ कोटी),साधना बॅँक, इचलकरंजी (११.५४ लाख),शेतकरी संघ पडळ शाखा (३.७८ लाख)शेतकरी संघ पडळ शाखा (१ लाख ६९ हजार)शिवाजी को-आॅप. बॅँक, गडहिंग्लज (१३ कोटी ३१ लाख) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी