शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

विश्वकोश ज्ञानमंडळांच्या माध्यमातून नवी ज्ञानसंस्कृती निर्माण :  दिलीप करंबेळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:02 IST

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देविश्वकोश ज्ञानमंडळांच्या माध्यमातून नवी ज्ञानसंस्कृती निर्माण :  करंबेळकरशिवाजी विद्यापीठातील कार्यशाळा

कोल्हापूर : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले.विश्वकोश निर्मिती मंडळ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित आधुनिक इतिहास ज्ञानमंडळाच्या नोंदलेखक कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यापीठातील इतिहास अधिविभागामधील या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.

अध्यक्ष करंबेळकर म्हणाले, मातृभाषेतून मिळालेले ज्ञान परिवर्तनास पोषक असते; त्यामुळे इतिहास लेखकांनी तटस्थपणे नोंदलेखन करून ते पुढील पिढ्यांसाठी ज्ञानसंचित राहील, याची काळजी घ्यावी. डॉ. भारती पाटील म्हणाल्या, व्यक्तीची सामाजिक व राजकीय भूमिका इतिहासातून घडत असते, त्यासाठी निष्पक्ष इतिहास लेखन करावे.या कार्यक्रमात आधुनिक इतिहास ज्ञानमंडळाच्या फलकाचे अनावरण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. विश्वकोश मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, विद्याव्यासंगी सहायक संपादक सरोजकुमार मिठारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस, डॉ. नीलांबरी जगताप, उमाकांत खामकर उपस्थित होते. समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय मचाले यांनी सूत्रसंचालन केले.

इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी आभार मानले. दरम्यान, या कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरीतील इतिहास अभ्यासक, लेखक सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर