शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

श्रीमंतीचीही रेषा तयार करा

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

गौतमीपुत्र कांबळे : शिवाजी विद्यापीठात भारताचा संविधान दिन साजरा

कोल्हापूर : भारतात आता दारिद्र्यरेषेप्रमाणे श्रीमंतांची यादी करून त्यांची एक श्रीमंतीचीही रेषा तयार करा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्यावतीने गुरुवारी भारताचा संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानव्यशास्त्र विभागात आयोजित ‘भारतीय राज्यघटना व डॉ. आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संविधान केवळ जगण्याचा विषय नाही, तर सामाजिक पर्यावरण बदलण्याचा घटनेने दिलेले साधन आहे. सर्व धार्मिकस्थळांवर जमा होणारी संपत्ती, दुरुस्ती, देखभाल वजा करून थेट सरकारी तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे देशातील जरूरीच्या गोष्टी विना कर्ज जनतेकरीता उपलब्ध होतील. अनेक देशांत उत्क्रांती झाली म्हणून त्या-त्या देशात ‘संविधान’ तयार झाले. आजही अस्पृश्यता राजरोसपणे आहे. भारतातील प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता नाही, असे जाहीर करावे. त्यांना मी स्वत: एक हजाराचे बक्षीस देईन. आरक्षणामध्येही कळीचे मुद्दे आले आहेत. त्यात तुमचा आर्थिक दर्जा सुधारला आम्हालाही आरक्षण द्या, अशा प्रतिक्रिया अन्य जातीच्या नागरिकांकडून आल्या. आजपर्यंत ज्या संविधानात राहून गेलेल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी धरण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. याशिवाय विद्यापीठ स्तरावर ‘संविधान’ हा विषय सक्तीचा करावा, असे मत त्यांनी मांडले. यावेळी कांबळे यांनी संविधानाची परिभाषा, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, आदी विषयांवर विस्तृत मते मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, धर्मनिरपेक्षता हाच कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यामुळे संविधानचा डोलारा डोलायमान होत आहे. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी संविधान सरनामा वाचन केले. यावेळी डॉ. भगवान माने, विद्यार्थी उपस्थित होते.