शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

श्रीमंतीचीही रेषा तयार करा

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

गौतमीपुत्र कांबळे : शिवाजी विद्यापीठात भारताचा संविधान दिन साजरा

कोल्हापूर : भारतात आता दारिद्र्यरेषेप्रमाणे श्रीमंतांची यादी करून त्यांची एक श्रीमंतीचीही रेषा तयार करा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्यावतीने गुरुवारी भारताचा संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानव्यशास्त्र विभागात आयोजित ‘भारतीय राज्यघटना व डॉ. आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संविधान केवळ जगण्याचा विषय नाही, तर सामाजिक पर्यावरण बदलण्याचा घटनेने दिलेले साधन आहे. सर्व धार्मिकस्थळांवर जमा होणारी संपत्ती, दुरुस्ती, देखभाल वजा करून थेट सरकारी तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे देशातील जरूरीच्या गोष्टी विना कर्ज जनतेकरीता उपलब्ध होतील. अनेक देशांत उत्क्रांती झाली म्हणून त्या-त्या देशात ‘संविधान’ तयार झाले. आजही अस्पृश्यता राजरोसपणे आहे. भारतातील प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता नाही, असे जाहीर करावे. त्यांना मी स्वत: एक हजाराचे बक्षीस देईन. आरक्षणामध्येही कळीचे मुद्दे आले आहेत. त्यात तुमचा आर्थिक दर्जा सुधारला आम्हालाही आरक्षण द्या, अशा प्रतिक्रिया अन्य जातीच्या नागरिकांकडून आल्या. आजपर्यंत ज्या संविधानात राहून गेलेल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी धरण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. याशिवाय विद्यापीठ स्तरावर ‘संविधान’ हा विषय सक्तीचा करावा, असे मत त्यांनी मांडले. यावेळी कांबळे यांनी संविधानाची परिभाषा, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, आदी विषयांवर विस्तृत मते मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, धर्मनिरपेक्षता हाच कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यामुळे संविधानचा डोलारा डोलायमान होत आहे. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी संविधान सरनामा वाचन केले. यावेळी डॉ. भगवान माने, विद्यार्थी उपस्थित होते.