शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

श्रीमंतीचीही रेषा तयार करा

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

गौतमीपुत्र कांबळे : शिवाजी विद्यापीठात भारताचा संविधान दिन साजरा

कोल्हापूर : भारतात आता दारिद्र्यरेषेप्रमाणे श्रीमंतांची यादी करून त्यांची एक श्रीमंतीचीही रेषा तयार करा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्यावतीने गुरुवारी भारताचा संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानव्यशास्त्र विभागात आयोजित ‘भारतीय राज्यघटना व डॉ. आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संविधान केवळ जगण्याचा विषय नाही, तर सामाजिक पर्यावरण बदलण्याचा घटनेने दिलेले साधन आहे. सर्व धार्मिकस्थळांवर जमा होणारी संपत्ती, दुरुस्ती, देखभाल वजा करून थेट सरकारी तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे देशातील जरूरीच्या गोष्टी विना कर्ज जनतेकरीता उपलब्ध होतील. अनेक देशांत उत्क्रांती झाली म्हणून त्या-त्या देशात ‘संविधान’ तयार झाले. आजही अस्पृश्यता राजरोसपणे आहे. भारतातील प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता नाही, असे जाहीर करावे. त्यांना मी स्वत: एक हजाराचे बक्षीस देईन. आरक्षणामध्येही कळीचे मुद्दे आले आहेत. त्यात तुमचा आर्थिक दर्जा सुधारला आम्हालाही आरक्षण द्या, अशा प्रतिक्रिया अन्य जातीच्या नागरिकांकडून आल्या. आजपर्यंत ज्या संविधानात राहून गेलेल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी धरण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे. याशिवाय विद्यापीठ स्तरावर ‘संविधान’ हा विषय सक्तीचा करावा, असे मत त्यांनी मांडले. यावेळी कांबळे यांनी संविधानाची परिभाषा, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, आदी विषयांवर विस्तृत मते मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले म्हणाले, धर्मनिरपेक्षता हाच कळीचा मुद्दा झालेला आहे. त्यामुळे संविधानचा डोलारा डोलायमान होत आहे. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी संविधान सरनामा वाचन केले. यावेळी डॉ. भगवान माने, विद्यार्थी उपस्थित होते.