शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मतमोजणी २० टेबलवरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:01 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही २० टेबलवरच होणार आहे. ही प्रक्रिया लवकर आटोपण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या प्रस्तावाला ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही २० टेबलवरच होणार आहे. ही प्रक्रिया लवकर आटोपण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार आहे. त्यासंदर्भात भारत निवडणूक आयोग सकारात्मक असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावानुसारच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासंदर्भात शनिवारी निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्याकडून आढावा घेतला.या निवडणुकीत यावेळी प्रथमच न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’मधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आयोगाच्या निर्देशानुसार १४ टेबलवर मतमोजणी करणे अपेक्षित आहे. याप्रमाणे मतमोजणी झाल्यास रात्री उशीर होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच १४ ऐवजी टेबल वाढवून ते २० केल्यास मतमोजणी ही लवकर होऊ शकते; त्यामुळे त्या पद्धतीचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविला. अद्याप त्याला मान्यता मिळालेली नसली, तरी जिल्हा निवडणूक विभागाने १४ व २० टेबल अशा दोन्ही स्तरांवर तयारी सुरू केली आहे. गुरुवार (दि. १६)पर्यंत निर्णय होईल; मतमोजणी ही २० टेबलनुसारच होणार हे गृहीत धरून तयारी करावी असे निर्देश अश्विनकुमार यांनी दिले.मतमोजणीसाठी कर्मचाºयांची नियुक्तीप्रत्येक टेबलसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, रांग अधिकारी, अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक, टपाली मतमोजणी पर्यवेक्षक, टपाली मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, संगणक आॅपरेटर, असे कर्मचारी लागणार आहेत. त्यादृष्टीने निवडणूक विभागाची कर्मचाºयांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे दीड हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत.पोस्टल मतमोजणीसाठीजादा अधिकारीपोस्टल मतमोजणीची प्रक्रिया ही दोन साहाय्यक निवडणूक कर्मचाºयांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. यावेळी मतपत्रिकांचे बारकोड तपासून, त्याचे स्कॅनिंग केले जाणार आहे; त्यामुळे या प्रक्रियेलाही वेळ लागणार आहे; त्यासाठी सहा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमल्यास ही प्रक्रिया लवकर होऊ शकते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी ‘व्हीसी’द्वारे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मागणी केली आहे.