शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मतमोजणी शांततेत-१९ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:21 IST

विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातल्याने किरकोळ वादावादी सोडली तर हाणामारीच्या घटना घडल्या नाहीत.

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहितीफूड पॅकेजवर आहे त्या ठिकाणी त्यांना भूक भागवावी लागली.

कोल्हापूर : विधानसभा पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी प्र्रक्रिया किरकोळ वादावादी वगळता शांततेत पार पडली. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातल्याने किरकोळ वादावादी सोडली तर हाणामारीच्या घटना घडल्या नाहीत. पोलिसांनी सतर्क राहून सुमारे १९ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी दिली.

दहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी पार पडली. करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा व शिवाजी विद्यापीठ राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम परिसरात पार पडली. या परिसरासह चौका-चौकांत, उपनगरांत व संवेदनशील गावांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस रस्त्यांवर उभे होते. शहरातील चौका-चौकांत आणि मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेट लावून सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

काही वाहनधारक या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस त्यांना रोखत पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देत होते. पहाटे पाचपासून ते मध्यरात्री १२ पर्यंत पोलीस रस्त्यांवर होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूवाडीचे अनिल कदम, गडहिंग्लजचे अंगद जाधवर, जयसिंगपूरचे किशोर काळे, इचलकरंजीचे गणेश बिरादार यांच्यासह निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, कॉन्स्टेबल, होमगार्ड सुमारे १९ तास जिल्ह्यातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते.

ताराबाई पार्क, कावळा नाका परिसरात बंदोबस्तभाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या पराभवाच्या दिशेने वाटचालीचे चित्र दिसताच आमदार सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा आणि कावळा नाका परिसरातील आलिशान हॉटेल परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पराभूत अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्यासह विजयी उमेदवार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, आदींच्या घरांसमोर बंदोबस्त ठेवला होता. या मार्गावरून दुचाकींवरून जाणाºया कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते.

  • नाश्त्यावरच बंदोबस्त

बंदोबस्तासाठी पोलीस पहाटे पाचपासून रस्त्यांवर उभे होते. त्यांना फक्त नाश्ता दिला होता. जेवण मिळाले नाही. रस्त्यावर उभे राहून पोलीस बंदोबस्त करीत होते. फूड पॅकेजवर आहे त्या ठिकाणी त्यांना भूक भागवावी लागली. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक