शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

कोथिंबीरची पेंढी ५० रुपयांवर, मेथीही कडाडली : कडधान्याचे दर मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:05 IST

कोथिंबीरची आवक मंदावल्याने दरात एकदम वाढ झाली असून, किरकोळ बाजारात जवारी कोथिंबीरची पेंढी तब्बल ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेथीही चांगलीच कडाडली असून, २0 रुपये पेंढी झाली आहे. कडधान्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. वटपौर्णिमेमुळे आंब्याच्या मागणीत वाढ झाली असून, ‘लालबाग’, ‘मद्रास’, ‘नीलम’ आंब्याने बाजार फुलून गेला आहे.

ठळक मुद्देकोथिंबीरची पेंढी ५० रुपयांवर, मेथीही कडाडली कडधान्याचे दर मात्र स्थिर

कोल्हापूर : कोथिंबीरची आवक मंदावल्याने दरात एकदम वाढ झाली असून, किरकोळ बाजारात जवारी कोथिंबीरची पेंढी तब्बल ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेथीही चांगलीच कडाडली असून, २0 रुपये पेंढी झाली आहे. कडधान्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. वटपौर्णिमेमुळे आंब्याच्या मागणीत वाढ झाली असून, ‘लालबाग’, ‘मद्रास’, ‘नीलम’ आंब्याने बाजार फुलून गेला आहे.मध्यंतरी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने कोथिंबीरच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. बाजार समितीत रोज १२ हजार पेंढ्यांची आवक होते. विशेषत: जवारी कोथिंबीरला अधिक मागणी असल्याने त्याचा दर ५० रुपये पेंढी पर्यंत पोहोचला आहे.

पालेभाज्यांची आवकही मंदावल्याने दरात वाढ झाली असून, मेथी २० रुपये, पोकळा १०, तर पालक पाच रुपये पेंढी राहिली आहे. कोबी, वांग्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नसून, टोमॅटोची आवक कायम राहिली असली तरी दरात थोडीसी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये टोमॅटो आहे. ढब्बू, गवार व वरणाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात वरणा ७५ रुपये किलो आहे. प्लॉवर, दोडका, भेंडीचे दर स्थिर आहेत.तूरडाळीच्या दरात थोडी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १00 रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. हरभरा डाळ, मटकी, मूगासह इतर कडधान्यांच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. साखर ३६ रुपये, सरकी तेल ८५ रुपयांवर कायम आहे. मान्सून अद्याप सक्रीय नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठांत शांतता दिसत आहे. वरणा बियाण्यांना मागणी वाढली असून, ६० ते ८० रुपये किलो पर्यंत दर आहे.फळ मार्केटमध्ये सध्या ‘तोतापुरी’, ‘अननस’ व आंब्याची आवक दिसते. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी आंबा खरेदीसाठी गर्दी दिसत होती. ‘नीलम’, ‘लालबाग’ आंबा ५० रुपये किलो आहे. फणसाची आवकही सुरू झाली असून, त्याचा २५ पासून १५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. तोतापुरी आंब्याची आवकही वाढू लागल्याने १0 ते २0 रुपये आंबा आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून, घाऊक बाजारात लसूण ५० रुपये किलोपर्यंत आहे.‘राजापुरी’ २५ रुपये आंबा!हापूस आंब्याचा हंगाम संपत आला असला, तरी ‘राजापुरी’ आंब्याची आवक सुरू झाली आहे. आकाराने मोठा असणारा आंबा २५ रुपयाला एक आहे. गोडीला चांगला असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. 

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर