शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

कोथिंबीरची पेंढी ५० रुपयांवर, मेथीही कडाडली : कडधान्याचे दर मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:05 IST

कोथिंबीरची आवक मंदावल्याने दरात एकदम वाढ झाली असून, किरकोळ बाजारात जवारी कोथिंबीरची पेंढी तब्बल ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेथीही चांगलीच कडाडली असून, २0 रुपये पेंढी झाली आहे. कडधान्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. वटपौर्णिमेमुळे आंब्याच्या मागणीत वाढ झाली असून, ‘लालबाग’, ‘मद्रास’, ‘नीलम’ आंब्याने बाजार फुलून गेला आहे.

ठळक मुद्देकोथिंबीरची पेंढी ५० रुपयांवर, मेथीही कडाडली कडधान्याचे दर मात्र स्थिर

कोल्हापूर : कोथिंबीरची आवक मंदावल्याने दरात एकदम वाढ झाली असून, किरकोळ बाजारात जवारी कोथिंबीरची पेंढी तब्बल ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेथीही चांगलीच कडाडली असून, २0 रुपये पेंढी झाली आहे. कडधान्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. वटपौर्णिमेमुळे आंब्याच्या मागणीत वाढ झाली असून, ‘लालबाग’, ‘मद्रास’, ‘नीलम’ आंब्याने बाजार फुलून गेला आहे.मध्यंतरी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने कोथिंबीरच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारात आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. बाजार समितीत रोज १२ हजार पेंढ्यांची आवक होते. विशेषत: जवारी कोथिंबीरला अधिक मागणी असल्याने त्याचा दर ५० रुपये पेंढी पर्यंत पोहोचला आहे.

पालेभाज्यांची आवकही मंदावल्याने दरात वाढ झाली असून, मेथी २० रुपये, पोकळा १०, तर पालक पाच रुपये पेंढी राहिली आहे. कोबी, वांग्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नसून, टोमॅटोची आवक कायम राहिली असली तरी दरात थोडीसी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये टोमॅटो आहे. ढब्बू, गवार व वरणाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात वरणा ७५ रुपये किलो आहे. प्लॉवर, दोडका, भेंडीचे दर स्थिर आहेत.तूरडाळीच्या दरात थोडी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १00 रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. हरभरा डाळ, मटकी, मूगासह इतर कडधान्यांच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. साखर ३६ रुपये, सरकी तेल ८५ रुपयांवर कायम आहे. मान्सून अद्याप सक्रीय नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठांत शांतता दिसत आहे. वरणा बियाण्यांना मागणी वाढली असून, ६० ते ८० रुपये किलो पर्यंत दर आहे.फळ मार्केटमध्ये सध्या ‘तोतापुरी’, ‘अननस’ व आंब्याची आवक दिसते. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी आंबा खरेदीसाठी गर्दी दिसत होती. ‘नीलम’, ‘लालबाग’ आंबा ५० रुपये किलो आहे. फणसाची आवकही सुरू झाली असून, त्याचा २५ पासून १५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. तोतापुरी आंब्याची आवकही वाढू लागल्याने १0 ते २0 रुपये आंबा आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून, घाऊक बाजारात लसूण ५० रुपये किलोपर्यंत आहे.‘राजापुरी’ २५ रुपये आंबा!हापूस आंब्याचा हंगाम संपत आला असला, तरी ‘राजापुरी’ आंब्याची आवक सुरू झाली आहे. आकाराने मोठा असणारा आंबा २५ रुपयाला एक आहे. गोडीला चांगला असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. 

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर