शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

गोठे येथील पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: April 23, 2015 00:58 IST

माजी सरपंचांचा आरोप : बोगस कागदपत्रांचा वापर करून ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक

कळे : गाठे (ता. पन्हाळा) येथील पेयजल योजनेच्या कामात बोगस कागदपत्रांचा वापर करून ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक करून मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी सरपंच सुनील पोतदार यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात शासनाच्या विविध कार्यालयात अर्ज देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. याची गांभीर्याने चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोतदार यांनी दिला आहे.जॅकवेल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वमालकीची जागा लागते. त्यासाठी धोंडिराम यशवंत पाटील यानी गट नं. १७६ ची जमीन ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करून दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात गट नं १७ची जमीन बांधकामास प्रमाणित असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे; पण प्रत्यक्षात जॅकवेल बांधकाम वेगळ्याच गटनंबरमध्ये चालू आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची फसवणूक केली असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत केला आहे.जॅकवेल बांधकाम चुकीच्या ठिकाणी सुरू असून, ते सर्व काम बंद ठेवण्याबाबत माजी सरपंच सुनील पोतदार यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीचे आदेश येऊनही वरिष्ठांच्या आदेशाची दखल न घेताच ग्रामपंचायत पेयजल योजना कमिटी व ठेकेदाराने काम सुरू केले असल्याचाही आरोप केला आहे.तसेच दि. १२/०८/२०१३ च्या ग्रामसभेत ठराव क्र. २० नुसार सामाजिक लेखा परीक्षण व नियंत्रण समिती गठित करण्यात आली होती. त्यामध्ये एका ग्रामपंचायत महिला सदस्याची बोगस सही केली असल्याची माहिती पोतदार यांनी देऊन पेयजल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. शासनाने चौकशी करून काम योग्य पद्धतीने करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.पत्रकार बैठकीस शिवाजी पाटील, बी. एन. पाटील, जोतिराम पाटील, श्रीकांत पाटील, आनंदा शिंदे, सुरेश कांबळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रात कोणत्याही प्रकारची बोगसगिरी नाही. आवश्यक ते बदल ग्रामपंचायत पेयजल योजना कमिटी व ग्रामीण पाणी पुरवठाविभागामार्फत सोयीनेच केले आहेत. शिवाय शासनाच्या आदेशानुसारच काम सुरू केले आहे. अद्याप कमिटीकडे कोणत्याही प्रकारचा निधी जमा झाला नसल्याने भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले, तरी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावासाठी नितांत आवश्यक असणारी पेयजल योजना पूर्ण करणारच. - संगीता पाटील, सरपंच, गोठे ग्रामपंचायत.