शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:06 IST

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे ...

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून महाराष्टÑ देशात पहिल्या क्रमांकावर नेऊया, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.लोणार वसाहत येथील गणेश हॉल येथे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती पुणे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, विभागीय अध्यक्ष बी. बी. काळे, जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, महाराष्टÑ तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष शाम जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे, तहसीलदार चंद्रशेखर सानप आदींची होती.मेळावा व आमसभेचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले.महसूलमंत्री पाटील म्हणाले, आॅनलाईन सात-बाºयाचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले असून हे काम फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करून विजयाची गुढी उभा करूया. भ्रष्टाचार करू नका कारण इथून पुढचा काळ हा प्रामाणिकपणाचा असून सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिकपणालाच संधी देणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २० तर राज्यात ३०० हून अधिक तलाठी लाचखोरीत निलंबित झाले. त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. सरकार तलाठ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व मागण्या मान्य करण्यास बांधील आहे. पुढील महिन्यात महसूलसंदर्भात मुंबईत बैठक घेऊन तलाठी संघाच्या पदाधिकाºयांशी चर्चा करू.एस. चोक्कलिंगम म्हणाले, राज्यातील ७५ तालुक्यांचे व पुणे विभागातील ३०० गावांचे संगणकीकरणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी संगणकाची गती वाढविण्यासाठी भारत संचार निगमकडून प्रयत्न होत आहेत. उर्वरित काम फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होईल.ज्ञानदेव डुबल म्हणाले, सातबारा संगणकीकरणाचा प्रकल्प हा शासनासह तलाठ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने पुरेशा सुविधा नसतानाही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी सर्व्हरच्या स्पीडसह इतर मागण्या सोडवाव्यात.म्हातारदेव सावंत यांनी स्वागत केले. लक्ष्मीकांत काजे यांनी प्रास्ताविक केले.तलाठी सरकारचे कान अन् डोळेतलाठी हे सरकार व गावचे कान आणि डोळे आहेत. त्यांच्याकडून सरकारला योग्य ती माहिती मिळते. त्यामुळे सरकार नेहमीच त्यांच्याकडे आदराने पाहत आला आहे. संपूर्ण गावाचे माहिती केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे, असे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले.