शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भक्तांनी वाहिलेल्या २६ लाखांच्या साड्या गायब ?, तीन वर्षांनी प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 12:56 IST

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला भक्तांनी वाहिलेल्या २६ लाख ३३ हजार किमतीच्या ५ हजारांवर साड्या अक्षरश: गायब झाल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी म्हणून या साड्या अंबाबाई मंदिरातून नेण्यात आल्या असून, त्या कोणी-कोणी नेल्या, कोणत्या तारखेला नेल्या, किती पूरग्रस्त महिलांना त्यांचे वाटप केले, त्यांची नावे, पत्ते यांपैकी कोणतीही माहिती देवस्थानच्या दप्तरी नोंद नाही. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्मचारीदेखील हैराण आहेत.

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या. त्या शहर-जिल्ह्यातील किती पूरग्रस्त महिलांना वाटण्यात आल्या, महिला निवडीचे निकष कोणते, लाभार्थी महिलांची यादी, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, साडी मिळाल्याची सही किंवा अंगठा यांपैकी कोणतीही माहिती देवस्थान समितीकडे नाही.

समितीच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अंबाबाई मंदिर आहे; तरीही मुख्य कार्यालयाकडे या साड्यांची माहिती नाही, हे आश्चर्यच आहे. सामाजिक साहाय्यतासंबंधीचे स्वतंत्र दप्तर आहे. त्यात विविध संस्थांना केलेली मदत, महापूर, कोरोनाकाळातील मदत यांची माहिती आहे; पण त्यात साड्यांबद्दलचे एकही कागदपत्र नाही. ‘लोकमत’ने माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर अंबाबाई मंदिरातून यादी मागवली गेली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

बेजबाबदारपणा की टाळाटाळ?

अंबाबाईला आलेल्या साड्या मंदिरात असतात. त्यांचा हिशेब ठेवण्याची सगळी जबाबदारी व्यवस्थापकांची आहे. ‘लोकमत’ने माहिती मागितल्यानंतर मंदिरातून मुख्य कार्यालयाला फक्त ५ हजार साड्या ज्या-ज्या दिवशी आल्या ती तारीख, पावती क्रमांक आणि मूळ किंमत एवढीच २०० पानांची यादी पाठविली आहे. महापुरानंतर आठ दिवसांत रोज ट्रॉली भरून साड्या मंदिरातून नेल्या जात असताना काहीतरी नोंद तेथील दप्तरी असणे अपेक्षित आहे; पण ही नोंदच नसेल तर टोकाचा बेजबाबदारपणा आहे किंवा नोंद असूनदेखील माहिती दिलेली नाही.

सहा प्रश्नांची उत्तरे निरंक

माहिती अधिकारात सात प्रश्न विचारले होते, त्यांपैकी ६ प्रश्नांबाबत ‘या कार्यालयाच्या अभिलेखात माहिती निरंक आहे,’ असे उत्तर मिळाले. फक्त चौथ्या क्रमांकात विचारलेल्या पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या एकूण साड्या किती, या प्रश्नावर ‘व्यवस्थापक, श्री करवीरनिवासिनी देवस्थान यांच्या रिपोर्टप्रमाणे पाच हजार साड्यांच्या यादीची छायांकित प्रत आहे,’ एवढेच उत्तर आले आहे.

मग साड्या नेल्या कोणी?

पूरग्रस्तांना वाटण्यासाठी या साड्या अधिकारी, पदाधिकारी किंवा सदस्यांनी नेल्या का? कोणी, किती साड्या कोणत्या तारखेला नेल्या, या प्रश्नांची उत्तरे समितीकडे नाहीत. साड्या पदाधिकाऱ्यांनी नेल्या नाहीत. देवस्थानमधील एकही कर्मचारी परस्पर एवढे मोठे धाडस करूच शकत नाहीत; मग साड्या नेल्या कोणी, त्यावेळी जबाबदार कर्मचारी काय करीत होते, हा मोठा प्रश्न आहे.

१० हजाराची साडी पूरग्रस्तांना ?

अंबाबाई मंदिरातून पूरग्रस्तांसाठी दिलेल्या साड्यांच्या यादीतील अनेक साड्यांची किंमत १ ते ११ हजार रुपयांपर्यंत आहे. देवस्थान समिती एवढी उदार झाली की, तिने एवढ्या महागड्या, भारदस्त, उंची आणि अंबाबाईला नेसविलेल्या साड्या पूरग्रस्तांना दिल्या आहेत; यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? उर्वरित साड्यांमध्येही काही साड्या या ५०० ते ९५० रुपयांपर्यंतच्या आहेत.

लाखोंचा अपहार

भाविकांनी अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीच्या ६० टक्के रक्कम भरून ती कोणालाही खरेदी करता येते. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ६० हजारांवर रक्कम भरून तिरूपती देवस्थानने दिलेला शालू खरेदी केला आहे. पण महापुराच्या काळात नेलेल्या उंची साड्यांचे पैसे संबंधितांनी देवस्थान समितीला जमा केलेले नाहीत. हा सरळसरळ साड्यांच्या नावाने झालेला लाखोंचा अपहार आहे.

किंमत : नेलेल्या साड्या

१ हजारच्या साड्या : १८१

२ हजारांच्या साड्या : १४३

३ हजारांच्या साड्या : ४९

४ हजारांच्या साड्या : ३३

५ हजारांच्या साड्या : २१

६ हजाराच्या : १४

७ हजारांच्या : १०

८ हजारांच्या साड्या : ८

९ हजारांच्या : ३

१० हजारांच्या : १

११ हजारांच्या : २

टॅग्स :kolhapurकोल्हापूर