शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भक्तांनी वाहिलेल्या २६ लाखांच्या साड्या गायब ?, तीन वर्षांनी प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 12:56 IST

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला भक्तांनी वाहिलेल्या २६ लाख ३३ हजार किमतीच्या ५ हजारांवर साड्या अक्षरश: गायब झाल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी म्हणून या साड्या अंबाबाई मंदिरातून नेण्यात आल्या असून, त्या कोणी-कोणी नेल्या, कोणत्या तारखेला नेल्या, किती पूरग्रस्त महिलांना त्यांचे वाटप केले, त्यांची नावे, पत्ते यांपैकी कोणतीही माहिती देवस्थानच्या दप्तरी नोंद नाही. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्मचारीदेखील हैराण आहेत.

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या. त्या शहर-जिल्ह्यातील किती पूरग्रस्त महिलांना वाटण्यात आल्या, महिला निवडीचे निकष कोणते, लाभार्थी महिलांची यादी, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, साडी मिळाल्याची सही किंवा अंगठा यांपैकी कोणतीही माहिती देवस्थान समितीकडे नाही.

समितीच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अंबाबाई मंदिर आहे; तरीही मुख्य कार्यालयाकडे या साड्यांची माहिती नाही, हे आश्चर्यच आहे. सामाजिक साहाय्यतासंबंधीचे स्वतंत्र दप्तर आहे. त्यात विविध संस्थांना केलेली मदत, महापूर, कोरोनाकाळातील मदत यांची माहिती आहे; पण त्यात साड्यांबद्दलचे एकही कागदपत्र नाही. ‘लोकमत’ने माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर अंबाबाई मंदिरातून यादी मागवली गेली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

बेजबाबदारपणा की टाळाटाळ?

अंबाबाईला आलेल्या साड्या मंदिरात असतात. त्यांचा हिशेब ठेवण्याची सगळी जबाबदारी व्यवस्थापकांची आहे. ‘लोकमत’ने माहिती मागितल्यानंतर मंदिरातून मुख्य कार्यालयाला फक्त ५ हजार साड्या ज्या-ज्या दिवशी आल्या ती तारीख, पावती क्रमांक आणि मूळ किंमत एवढीच २०० पानांची यादी पाठविली आहे. महापुरानंतर आठ दिवसांत रोज ट्रॉली भरून साड्या मंदिरातून नेल्या जात असताना काहीतरी नोंद तेथील दप्तरी असणे अपेक्षित आहे; पण ही नोंदच नसेल तर टोकाचा बेजबाबदारपणा आहे किंवा नोंद असूनदेखील माहिती दिलेली नाही.

सहा प्रश्नांची उत्तरे निरंक

माहिती अधिकारात सात प्रश्न विचारले होते, त्यांपैकी ६ प्रश्नांबाबत ‘या कार्यालयाच्या अभिलेखात माहिती निरंक आहे,’ असे उत्तर मिळाले. फक्त चौथ्या क्रमांकात विचारलेल्या पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या एकूण साड्या किती, या प्रश्नावर ‘व्यवस्थापक, श्री करवीरनिवासिनी देवस्थान यांच्या रिपोर्टप्रमाणे पाच हजार साड्यांच्या यादीची छायांकित प्रत आहे,’ एवढेच उत्तर आले आहे.

मग साड्या नेल्या कोणी?

पूरग्रस्तांना वाटण्यासाठी या साड्या अधिकारी, पदाधिकारी किंवा सदस्यांनी नेल्या का? कोणी, किती साड्या कोणत्या तारखेला नेल्या, या प्रश्नांची उत्तरे समितीकडे नाहीत. साड्या पदाधिकाऱ्यांनी नेल्या नाहीत. देवस्थानमधील एकही कर्मचारी परस्पर एवढे मोठे धाडस करूच शकत नाहीत; मग साड्या नेल्या कोणी, त्यावेळी जबाबदार कर्मचारी काय करीत होते, हा मोठा प्रश्न आहे.

१० हजाराची साडी पूरग्रस्तांना ?

अंबाबाई मंदिरातून पूरग्रस्तांसाठी दिलेल्या साड्यांच्या यादीतील अनेक साड्यांची किंमत १ ते ११ हजार रुपयांपर्यंत आहे. देवस्थान समिती एवढी उदार झाली की, तिने एवढ्या महागड्या, भारदस्त, उंची आणि अंबाबाईला नेसविलेल्या साड्या पूरग्रस्तांना दिल्या आहेत; यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? उर्वरित साड्यांमध्येही काही साड्या या ५०० ते ९५० रुपयांपर्यंतच्या आहेत.

लाखोंचा अपहार

भाविकांनी अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीच्या ६० टक्के रक्कम भरून ती कोणालाही खरेदी करता येते. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ६० हजारांवर रक्कम भरून तिरूपती देवस्थानने दिलेला शालू खरेदी केला आहे. पण महापुराच्या काळात नेलेल्या उंची साड्यांचे पैसे संबंधितांनी देवस्थान समितीला जमा केलेले नाहीत. हा सरळसरळ साड्यांच्या नावाने झालेला लाखोंचा अपहार आहे.

किंमत : नेलेल्या साड्या

१ हजारच्या साड्या : १८१

२ हजारांच्या साड्या : १४३

३ हजारांच्या साड्या : ४९

४ हजारांच्या साड्या : ३३

५ हजारांच्या साड्या : २१

६ हजाराच्या : १४

७ हजारांच्या : १०

८ हजारांच्या साड्या : ८

९ हजारांच्या : ३

१० हजारांच्या : १

११ हजारांच्या : २

टॅग्स :kolhapurकोल्हापूर