शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भक्तांनी वाहिलेल्या २६ लाखांच्या साड्या गायब ?, तीन वर्षांनी प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 12:56 IST

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला भक्तांनी वाहिलेल्या २६ लाख ३३ हजार किमतीच्या ५ हजारांवर साड्या अक्षरश: गायब झाल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी म्हणून या साड्या अंबाबाई मंदिरातून नेण्यात आल्या असून, त्या कोणी-कोणी नेल्या, कोणत्या तारखेला नेल्या, किती पूरग्रस्त महिलांना त्यांचे वाटप केले, त्यांची नावे, पत्ते यांपैकी कोणतीही माहिती देवस्थानच्या दप्तरी नोंद नाही. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्मचारीदेखील हैराण आहेत.

सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पीडित महिलांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने साड्या वाटपाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबाबाई मंदिरातून ५ हजार साड्या नेण्यात आल्या. त्या शहर-जिल्ह्यातील किती पूरग्रस्त महिलांना वाटण्यात आल्या, महिला निवडीचे निकष कोणते, लाभार्थी महिलांची यादी, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, साडी मिळाल्याची सही किंवा अंगठा यांपैकी कोणतीही माहिती देवस्थान समितीकडे नाही.

समितीच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर अंबाबाई मंदिर आहे; तरीही मुख्य कार्यालयाकडे या साड्यांची माहिती नाही, हे आश्चर्यच आहे. सामाजिक साहाय्यतासंबंधीचे स्वतंत्र दप्तर आहे. त्यात विविध संस्थांना केलेली मदत, महापूर, कोरोनाकाळातील मदत यांची माहिती आहे; पण त्यात साड्यांबद्दलचे एकही कागदपत्र नाही. ‘लोकमत’ने माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर अंबाबाई मंदिरातून यादी मागवली गेली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

बेजबाबदारपणा की टाळाटाळ?

अंबाबाईला आलेल्या साड्या मंदिरात असतात. त्यांचा हिशेब ठेवण्याची सगळी जबाबदारी व्यवस्थापकांची आहे. ‘लोकमत’ने माहिती मागितल्यानंतर मंदिरातून मुख्य कार्यालयाला फक्त ५ हजार साड्या ज्या-ज्या दिवशी आल्या ती तारीख, पावती क्रमांक आणि मूळ किंमत एवढीच २०० पानांची यादी पाठविली आहे. महापुरानंतर आठ दिवसांत रोज ट्रॉली भरून साड्या मंदिरातून नेल्या जात असताना काहीतरी नोंद तेथील दप्तरी असणे अपेक्षित आहे; पण ही नोंदच नसेल तर टोकाचा बेजबाबदारपणा आहे किंवा नोंद असूनदेखील माहिती दिलेली नाही.

सहा प्रश्नांची उत्तरे निरंक

माहिती अधिकारात सात प्रश्न विचारले होते, त्यांपैकी ६ प्रश्नांबाबत ‘या कार्यालयाच्या अभिलेखात माहिती निरंक आहे,’ असे उत्तर मिळाले. फक्त चौथ्या क्रमांकात विचारलेल्या पूरग्रस्त महिलांना वाटलेल्या एकूण साड्या किती, या प्रश्नावर ‘व्यवस्थापक, श्री करवीरनिवासिनी देवस्थान यांच्या रिपोर्टप्रमाणे पाच हजार साड्यांच्या यादीची छायांकित प्रत आहे,’ एवढेच उत्तर आले आहे.

मग साड्या नेल्या कोणी?

पूरग्रस्तांना वाटण्यासाठी या साड्या अधिकारी, पदाधिकारी किंवा सदस्यांनी नेल्या का? कोणी, किती साड्या कोणत्या तारखेला नेल्या, या प्रश्नांची उत्तरे समितीकडे नाहीत. साड्या पदाधिकाऱ्यांनी नेल्या नाहीत. देवस्थानमधील एकही कर्मचारी परस्पर एवढे मोठे धाडस करूच शकत नाहीत; मग साड्या नेल्या कोणी, त्यावेळी जबाबदार कर्मचारी काय करीत होते, हा मोठा प्रश्न आहे.

१० हजाराची साडी पूरग्रस्तांना ?

अंबाबाई मंदिरातून पूरग्रस्तांसाठी दिलेल्या साड्यांच्या यादीतील अनेक साड्यांची किंमत १ ते ११ हजार रुपयांपर्यंत आहे. देवस्थान समिती एवढी उदार झाली की, तिने एवढ्या महागड्या, भारदस्त, उंची आणि अंबाबाईला नेसविलेल्या साड्या पूरग्रस्तांना दिल्या आहेत; यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? उर्वरित साड्यांमध्येही काही साड्या या ५०० ते ९५० रुपयांपर्यंतच्या आहेत.

लाखोंचा अपहार

भाविकांनी अंबाबाईला अर्पण केलेल्या साडीच्या ६० टक्के रक्कम भरून ती कोणालाही खरेदी करता येते. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील ६० हजारांवर रक्कम भरून तिरूपती देवस्थानने दिलेला शालू खरेदी केला आहे. पण महापुराच्या काळात नेलेल्या उंची साड्यांचे पैसे संबंधितांनी देवस्थान समितीला जमा केलेले नाहीत. हा सरळसरळ साड्यांच्या नावाने झालेला लाखोंचा अपहार आहे.

किंमत : नेलेल्या साड्या

१ हजारच्या साड्या : १८१

२ हजारांच्या साड्या : १४३

३ हजारांच्या साड्या : ४९

४ हजारांच्या साड्या : ३३

५ हजारांच्या साड्या : २१

६ हजाराच्या : १४

७ हजारांच्या : १०

८ हजारांच्या साड्या : ८

९ हजारांच्या : ३

१० हजारांच्या : १

११ हजारांच्या : २

टॅग्स :kolhapurकोल्हापूर