शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील सव्वा लाख जणांना तीन महिन्यांची पेन्शन मिळणार एकदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:21 IST

श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ८ जणांना होणार आहे. ही रक्कम या महिन्यातच जिल्हा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सव्वा लाख जणांना तीन महिन्यांची पेन्शन मिळणार एकदम ‘श्रावणबाळ’, ‘संजय गांधी’सह इतर योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश

प्रवीण देसाई कोल्हापूर : श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ८ जणांना होणार आहे. ही रक्कम या महिन्यातच जिल्हा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता, केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून महिन्यांतील अर्थसाहाय्य व पेन्शन एकत्रित जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

ही रक्कम महिनाअखेर जमा होणार आहे. याचा जिल्ह्यातील विविध योजनांच्या एक लाख ३० हजार ८ जणांना लाभ होणार आहे. नियमित अर्थसाहाय्य व पेन्शनसोबतच केंद्र सरकारने केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी नियमित पेन्शनव्यतिरिक्त ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एप्रिल व मे या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी ५०० रुपये अनुदान हे मे महिन्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य योजनेचे उपसचिव एस. जी. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे दिले आहेत.लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन अशीकेंद्र सरकारपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ८०० ते १००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळते; तर राज्य सरकारपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १००० ते १२०० रुपयांची पेन्शन दिली जाते.

सरकारने तीन महिन्यांची पेन्शन लाभार्थ्यांना एकदम देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु ही रक्कम पोस्टामार्फत थेट लाभार्थ्यांच्या घरी पोहोच करावी. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे.- किशोर घाटगे, अध्यक्ष, कोल्हापूर उत्तर संजय गांधी निराधार योजना समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर