शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

CoronaVirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेय, आता सगळेच कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:53 IST

ले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेयबंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले

कोल्हापूर : गेले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सापडलेल्या दहापैकी तीन कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सात रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यात सीपीआर तसेच जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सतरा अठरा दिवसांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे सर्वच पातळीवर थोडी शिथिलता येऊ लागली आहे. घरात बसून शहरवासीय कंटाळले आहेत, तर चोवीस तास उन्हातान्हात बंदोबस्त करून पोलिसांचीही दमछाक होऊ लागली आहे. म्हणूनच ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होताना पहायला मिळत आहे.त्याचा परिणाम म्हणून खरेदीच्या निमित्ताने शहरातील गर्दीही हळूहळू वाढू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करुनही काहीजण नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुचाकीवरून एकानेच प्रवास करायचा आहे, तरीही दोघे बसून प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनातून फक्त दोघांनाच आणि तेही चालक बसल्यावर त्याच्या मागे दुसऱ्याने बसायचे आहे. पण हा सुध्दा नियम बासनात गुंडाळून ठेवला जात आहे.

किराणा मालाची दुकाने तसेच धान्याच्या, मिरच्यांच्या दुकानासमोर गर्दी वाढलेली असून, या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम देखील पायदळी तुडविला जात आहे.पुन्हा एकदा बाजारपेठेत हाच अनुभव आला. महापालिका प्रशासनाने गर्दी टाळण्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र शहरवासीयांचा तसेच भाजी विक्रेते, दुकानदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.

या दिवसात मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. घरोघरी मिरची कांडप, चटणीची कामे केली जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे या नियमित कामांना ब्रेक लागला आहे. मात्र ही कामे करणेच आवश्यक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीला बाहेर पडत आहेत. प्रशासनाने सवलत दिली याचा अर्थ घालून दिलेले नियम पायदळी तुडवावेत, असे नाही तर ते अधिक जागरुकपणे पाळणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर