शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

CoronaVirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेय, आता सगळेच कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:53 IST

ले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेयबंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले

कोल्हापूर : गेले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सापडलेल्या दहापैकी तीन कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सात रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यात सीपीआर तसेच जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सतरा अठरा दिवसांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे सर्वच पातळीवर थोडी शिथिलता येऊ लागली आहे. घरात बसून शहरवासीय कंटाळले आहेत, तर चोवीस तास उन्हातान्हात बंदोबस्त करून पोलिसांचीही दमछाक होऊ लागली आहे. म्हणूनच ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होताना पहायला मिळत आहे.त्याचा परिणाम म्हणून खरेदीच्या निमित्ताने शहरातील गर्दीही हळूहळू वाढू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करुनही काहीजण नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुचाकीवरून एकानेच प्रवास करायचा आहे, तरीही दोघे बसून प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनातून फक्त दोघांनाच आणि तेही चालक बसल्यावर त्याच्या मागे दुसऱ्याने बसायचे आहे. पण हा सुध्दा नियम बासनात गुंडाळून ठेवला जात आहे.

किराणा मालाची दुकाने तसेच धान्याच्या, मिरच्यांच्या दुकानासमोर गर्दी वाढलेली असून, या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम देखील पायदळी तुडविला जात आहे.पुन्हा एकदा बाजारपेठेत हाच अनुभव आला. महापालिका प्रशासनाने गर्दी टाळण्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र शहरवासीयांचा तसेच भाजी विक्रेते, दुकानदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.

या दिवसात मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. घरोघरी मिरची कांडप, चटणीची कामे केली जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे या नियमित कामांना ब्रेक लागला आहे. मात्र ही कामे करणेच आवश्यक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीला बाहेर पडत आहेत. प्रशासनाने सवलत दिली याचा अर्थ घालून दिलेले नियम पायदळी तुडवावेत, असे नाही तर ते अधिक जागरुकपणे पाळणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर