शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेय, आता सगळेच कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:53 IST

ले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेयबंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले

कोल्हापूर : गेले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सापडलेल्या दहापैकी तीन कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सात रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यात सीपीआर तसेच जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सतरा अठरा दिवसांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे सर्वच पातळीवर थोडी शिथिलता येऊ लागली आहे. घरात बसून शहरवासीय कंटाळले आहेत, तर चोवीस तास उन्हातान्हात बंदोबस्त करून पोलिसांचीही दमछाक होऊ लागली आहे. म्हणूनच ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होताना पहायला मिळत आहे.त्याचा परिणाम म्हणून खरेदीच्या निमित्ताने शहरातील गर्दीही हळूहळू वाढू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करुनही काहीजण नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुचाकीवरून एकानेच प्रवास करायचा आहे, तरीही दोघे बसून प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनातून फक्त दोघांनाच आणि तेही चालक बसल्यावर त्याच्या मागे दुसऱ्याने बसायचे आहे. पण हा सुध्दा नियम बासनात गुंडाळून ठेवला जात आहे.

किराणा मालाची दुकाने तसेच धान्याच्या, मिरच्यांच्या दुकानासमोर गर्दी वाढलेली असून, या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम देखील पायदळी तुडविला जात आहे.पुन्हा एकदा बाजारपेठेत हाच अनुभव आला. महापालिका प्रशासनाने गर्दी टाळण्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र शहरवासीयांचा तसेच भाजी विक्रेते, दुकानदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.

या दिवसात मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. घरोघरी मिरची कांडप, चटणीची कामे केली जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे या नियमित कामांना ब्रेक लागला आहे. मात्र ही कामे करणेच आवश्यक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीला बाहेर पडत आहेत. प्रशासनाने सवलत दिली याचा अर्थ घालून दिलेले नियम पायदळी तुडवावेत, असे नाही तर ते अधिक जागरुकपणे पाळणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर