शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :परराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:48 IST

कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.

ठळक मुद्देपरराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत आयुष्यांच्या पेटवा मशाली : उद्योग सुरु झाल्याने हाताला मिळाले काम

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने पुन्हा कारखाने सुरू झाले आहेत. कामगारांना काम उपलब्ध होऊ लागले आहे.लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे परराज्यांतील अनेक कामगार आपापल्या मूळ गावाकडे परत निघाले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरू होऊ लागल्याने कामगारांना काम मिळू लागल्याने अनेकांंनी गावी जाण्याचा निर्णय बदलला आहे.कोरोना तो सभी जगह है....कोरोना सिर्फ महाराष्ट्र में है ऐसी बात नहीं... कोरोना तो सभी जगह है. गाँव जायेंगे तो वहां भी रहेगा, अशी बोलकी प्रतिक्रिया परराज्यांतील कामगारांनी व्यक्त केली. तसेच गावी जाऊन करायचे काय असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले काम आता पुन्हा सुरू झाल्याने चार पैसे मिळत आहेत. त्यामुळे अशा संकटकाळातही काम करून चार पैसे मिळवून गावी पाठवू तर शकतो. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय आम्ही बदलला असल्याचे अनेक परराज्यांतील कामगारांनी सांगितले.

गावाकडे काम नाही म्हणून सात वर्षे पूर्वी कोल्हापुरात आलो आहे. कोल्हापूरची स्थिती चांगली असल्याने या ठिकाणी राहणे सुरक्षित वाटते. आता पुन्हा काम सुरू झाल्याने गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही.मिथुन शेख, पुतीमरी, नदिया (राज्य प. बंगाल)

कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेलो तर तिथे ही कोरोनाचा आहेच की, परत तिथे कोणतेही काम नसणार आणि कोरोनाचे संकट असे दुहेरी संकट डोक्यावर राहणार आहे. त्यापेक्षा या ठिकाणी काम उपलब्ध झाल्याने चार पैसे तरी घरी पाठवू शकतो.- अजय कुमार,जि. गया (राज्य बिहार)

कारखाने सुरू झाल्याने कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. गावी जाऊन पुन्हा रोजगारांची प्रश्न असल्याने अनेकांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कारखान्यात परराज्यातील कामगार आहेत. यांच्या आरोग्य तपासणी केली आहे. यासह जेवण्याची व्यवस्था केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून शिफ्टमध्ये काम सुरू आहेउत्तम जाधव, उद्योजक

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर