शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

CoronaVirus Lockdown :परराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:48 IST

कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.

ठळक मुद्देपरराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत आयुष्यांच्या पेटवा मशाली : उद्योग सुरु झाल्याने हाताला मिळाले काम

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने पुन्हा कारखाने सुरू झाले आहेत. कामगारांना काम उपलब्ध होऊ लागले आहे.लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे परराज्यांतील अनेक कामगार आपापल्या मूळ गावाकडे परत निघाले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरू होऊ लागल्याने कामगारांना काम मिळू लागल्याने अनेकांंनी गावी जाण्याचा निर्णय बदलला आहे.कोरोना तो सभी जगह है....कोरोना सिर्फ महाराष्ट्र में है ऐसी बात नहीं... कोरोना तो सभी जगह है. गाँव जायेंगे तो वहां भी रहेगा, अशी बोलकी प्रतिक्रिया परराज्यांतील कामगारांनी व्यक्त केली. तसेच गावी जाऊन करायचे काय असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले काम आता पुन्हा सुरू झाल्याने चार पैसे मिळत आहेत. त्यामुळे अशा संकटकाळातही काम करून चार पैसे मिळवून गावी पाठवू तर शकतो. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय आम्ही बदलला असल्याचे अनेक परराज्यांतील कामगारांनी सांगितले.

गावाकडे काम नाही म्हणून सात वर्षे पूर्वी कोल्हापुरात आलो आहे. कोल्हापूरची स्थिती चांगली असल्याने या ठिकाणी राहणे सुरक्षित वाटते. आता पुन्हा काम सुरू झाल्याने गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही.मिथुन शेख, पुतीमरी, नदिया (राज्य प. बंगाल)

कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेलो तर तिथे ही कोरोनाचा आहेच की, परत तिथे कोणतेही काम नसणार आणि कोरोनाचे संकट असे दुहेरी संकट डोक्यावर राहणार आहे. त्यापेक्षा या ठिकाणी काम उपलब्ध झाल्याने चार पैसे तरी घरी पाठवू शकतो.- अजय कुमार,जि. गया (राज्य बिहार)

कारखाने सुरू झाल्याने कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. गावी जाऊन पुन्हा रोजगारांची प्रश्न असल्याने अनेकांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कारखान्यात परराज्यातील कामगार आहेत. यांच्या आरोग्य तपासणी केली आहे. यासह जेवण्याची व्यवस्था केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून शिफ्टमध्ये काम सुरू आहेउत्तम जाधव, उद्योजक

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर