शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus Lockdown :परराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:48 IST

कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.

ठळक मुद्देपरराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत आयुष्यांच्या पेटवा मशाली : उद्योग सुरु झाल्याने हाताला मिळाले काम

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने पुन्हा कारखाने सुरू झाले आहेत. कामगारांना काम उपलब्ध होऊ लागले आहे.लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे परराज्यांतील अनेक कामगार आपापल्या मूळ गावाकडे परत निघाले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरू होऊ लागल्याने कामगारांना काम मिळू लागल्याने अनेकांंनी गावी जाण्याचा निर्णय बदलला आहे.कोरोना तो सभी जगह है....कोरोना सिर्फ महाराष्ट्र में है ऐसी बात नहीं... कोरोना तो सभी जगह है. गाँव जायेंगे तो वहां भी रहेगा, अशी बोलकी प्रतिक्रिया परराज्यांतील कामगारांनी व्यक्त केली. तसेच गावी जाऊन करायचे काय असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले काम आता पुन्हा सुरू झाल्याने चार पैसे मिळत आहेत. त्यामुळे अशा संकटकाळातही काम करून चार पैसे मिळवून गावी पाठवू तर शकतो. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय आम्ही बदलला असल्याचे अनेक परराज्यांतील कामगारांनी सांगितले.

गावाकडे काम नाही म्हणून सात वर्षे पूर्वी कोल्हापुरात आलो आहे. कोल्हापूरची स्थिती चांगली असल्याने या ठिकाणी राहणे सुरक्षित वाटते. आता पुन्हा काम सुरू झाल्याने गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही.मिथुन शेख, पुतीमरी, नदिया (राज्य प. बंगाल)

कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेलो तर तिथे ही कोरोनाचा आहेच की, परत तिथे कोणतेही काम नसणार आणि कोरोनाचे संकट असे दुहेरी संकट डोक्यावर राहणार आहे. त्यापेक्षा या ठिकाणी काम उपलब्ध झाल्याने चार पैसे तरी घरी पाठवू शकतो.- अजय कुमार,जि. गया (राज्य बिहार)

कारखाने सुरू झाल्याने कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. गावी जाऊन पुन्हा रोजगारांची प्रश्न असल्याने अनेकांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कारखान्यात परराज्यातील कामगार आहेत. यांच्या आरोग्य तपासणी केली आहे. यासह जेवण्याची व्यवस्था केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून शिफ्टमध्ये काम सुरू आहेउत्तम जाधव, उद्योजक

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर