शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

CoronaVirus Lockdown : ठेकेदारांसह नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:53 IST

लॉकडाऊन असतानाही बिलाचे कारण घेऊन जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्या ठेकेदारांसह आणि नागरिकांना जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक असेल तर परवानगी घ्यावी लागणार आहे. मनाई असतानाही येणाऱ्यांना गेटवरच अडवून कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

ठळक मुद्देठेकेदारांसह नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्यास मनाईअत्यावश्यक असेल तरच परवानगी: स्थायी समितीचा निर्णय

कोल्हापूर : लॉकडाऊन असतानाही बिलाचे कारण घेऊन जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्या ठेकेदारांसह आणि नागरिकांना जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक असेल तर परवानगी घ्यावी लागणार आहे. मनाई असतानाही येणाऱ्यांना गेटवरच अडवून कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. विभागप्रमुख आणि केवळ पाच टक्के कर्मचारी असे नियोजन सुरुवातीपासून ठेवले आहे. सोमवारी यात शासन आदेशानुसार नियम करुन ही उपस्थिती १0 टक्केपर्यंत वाढवले आहे.

कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवली असताना, जणू काही लॉकडाऊनच शिथिल झाला या अविर्भावात नागरिकांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली. यात ठेकेदारांचीच संख्या जास्त होती. सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवण्याच्या या प्रकाराची चर्चा जिल्हा परिषदेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली.अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि सर्व सभापती, स्थायी समिती सदस्य, सीईओ अमन मित्तल आणि सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ठेकेदारांच्या गर्दीवरुन चिंता व्यक्त केली गेली.

ठेकेदारांनी एकाही बिलासाठी जिल्हा परिषदेत येऊ नये, तालुकास्तरावर पंचायत समितीतच त्यांनी बिल सादर करावे, तेथून जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत ते मुख्यालयात पोहोचेल असे नियोजन ठरले. अत्यंत आवश्यक असेल तरच मुख्यालयात अभ्यागतांना सोडावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या. सुरक्षारक्षकांनी अधिक सतर्क राहून काम करावे, असेही सूचित केले.कोरोनाने मृत्यू झाल्यास ५ लाखकोरोनाच्या या वातावरणात काम करताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीने घेतला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर