शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

CoronaVirus Lockdown : मुश्रीफ यांची टीका अपयश लपविण्यासाठी, भाजपचे प्रत्युतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:19 IST

कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देमुश्रीफ यांची टीका अपयश लपविण्यासाठी, भाजपचे प्रत्युतरचंद्रकांत पाटील आपत्तीवेळी पहाडासारखे सामोरे गेले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.

कोरोनाच्या संकटात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कोल्हापूरची माणसे जगली की मेली हे तरी बघायला यावे, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. पक्षाच्या तातडीच्या बैठकीत मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे, विविध समारंभांमध्ये केवळ आणि केवळ चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचे राजकारण पुढे जात नाही, अशा मुश्रीफ यांनी महाराष्ट्र कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहे, याचा काळ आणि वेळ ओळखून राजकीय टीकाटिपण्णी बंद करावी.

आपण ग्रामविकास मंत्री म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा विचार करणे गरजेचे असताना, त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी राजकारणाच्या खालच्या पातळीवर जाऊ नये. पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना महाराष्ट्राचा विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो.

याउलट आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यास किती न्याय दिला व पालकमंत्री म्हणून काम करत असताना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याचे मार्गदर्शन पाटील यांच्याकडून घ्यावे असे सूचित करावेसे वाटते. महापुरामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी पाटील यांनी जी मदत केली, ती आजपण लोकांच्या लक्षात आहे.मुश्रीफ कायम लक्ष्मीदर्शनाचाच मुद्दा काढतात. हे अनाकलनीय असून पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी सत्तेचा उपयोग किंवा त्याची गरिमा राखण्याचे काम केले, हे कोल्हापूरची जनता चांगल्या पद्धतीने जाणते. जनसेवा करीत असताना किंवा संकटामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करत असताना पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श ठेवून त्यांचे जीवन सुकर केले.

यावेळी त्यांनी प्रसिद्धीचा हव्यास केला? नाही; पण मंत्री मुश्रीफ यांनी स्वत:चा स्वयंघोषित श्रावणबाळ असा उल्लेख लावून कोणता आदर्श निर्माण केला? सरकार तुमचे, तुम्ही मंत्री, सर्व यंत्रणा तुमच्या अधीन असे असताना लोकांना मदत करायची सोडून सातत्याने पाटील यांच्यावर टीका करून आपल्या पक्षप्रमुखांची वाहवा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला? आहे.पाटील यांनी ते मंत्री असताना अवनि, सावली, स्वयंसिद्धा या सेवाभावी संस्थांना मदत केली. अनेक खेळाडूंना खेळांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या. अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधोपचारांसह सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिल्या.

अशा प्रकारे सामाजिक भान ठेवून गरजू लोकांना मदत केली तर अशा विधायक कामाला लक्ष्मीदर्शन म्हणणे योग्य आहे का, असा सवाल देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी उपस्थित केला.कोरोना संकटातही कामकोरोनाच्या संकटात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने गरीब लोकांसाठी अन्नधान्य वाटप, जेवण पुरवणे, मास्क, सॅनिटायझर तसेच वैद्यकीय सुविधा पुरवणे असे उपक्रम सुरू आहेत. सी.पी.आर. रुग्णालयाला महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी भाजपच्या वतीने एक हजार मास्क दिले आहेत. हे काम करीत असताना पाटील हे कोल्हापुरात नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर