शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

CoronaVirus Lockdown : मुश्रीफ यांची टीका अपयश लपविण्यासाठी, भाजपचे प्रत्युतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:19 IST

कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देमुश्रीफ यांची टीका अपयश लपविण्यासाठी, भाजपचे प्रत्युतरचंद्रकांत पाटील आपत्तीवेळी पहाडासारखे सामोरे गेले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.

कोरोनाच्या संकटात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कोल्हापूरची माणसे जगली की मेली हे तरी बघायला यावे, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. पक्षाच्या तातडीच्या बैठकीत मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे, विविध समारंभांमध्ये केवळ आणि केवळ चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचे राजकारण पुढे जात नाही, अशा मुश्रीफ यांनी महाराष्ट्र कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहे, याचा काळ आणि वेळ ओळखून राजकीय टीकाटिपण्णी बंद करावी.

आपण ग्रामविकास मंत्री म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा विचार करणे गरजेचे असताना, त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी राजकारणाच्या खालच्या पातळीवर जाऊ नये. पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना महाराष्ट्राचा विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो.

याउलट आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या जिल्ह्यास किती न्याय दिला व पालकमंत्री म्हणून काम करत असताना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, याचे मार्गदर्शन पाटील यांच्याकडून घ्यावे असे सूचित करावेसे वाटते. महापुरामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी पाटील यांनी जी मदत केली, ती आजपण लोकांच्या लक्षात आहे.मुश्रीफ कायम लक्ष्मीदर्शनाचाच मुद्दा काढतात. हे अनाकलनीय असून पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी सत्तेचा उपयोग किंवा त्याची गरिमा राखण्याचे काम केले, हे कोल्हापूरची जनता चांगल्या पद्धतीने जाणते. जनसेवा करीत असताना किंवा संकटामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करत असताना पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श ठेवून त्यांचे जीवन सुकर केले.

यावेळी त्यांनी प्रसिद्धीचा हव्यास केला? नाही; पण मंत्री मुश्रीफ यांनी स्वत:चा स्वयंघोषित श्रावणबाळ असा उल्लेख लावून कोणता आदर्श निर्माण केला? सरकार तुमचे, तुम्ही मंत्री, सर्व यंत्रणा तुमच्या अधीन असे असताना लोकांना मदत करायची सोडून सातत्याने पाटील यांच्यावर टीका करून आपल्या पक्षप्रमुखांची वाहवा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला? आहे.पाटील यांनी ते मंत्री असताना अवनि, सावली, स्वयंसिद्धा या सेवाभावी संस्थांना मदत केली. अनेक खेळाडूंना खेळांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या. अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधोपचारांसह सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिल्या.

अशा प्रकारे सामाजिक भान ठेवून गरजू लोकांना मदत केली तर अशा विधायक कामाला लक्ष्मीदर्शन म्हणणे योग्य आहे का, असा सवाल देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी उपस्थित केला.कोरोना संकटातही कामकोरोनाच्या संकटात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने गरीब लोकांसाठी अन्नधान्य वाटप, जेवण पुरवणे, मास्क, सॅनिटायझर तसेच वैद्यकीय सुविधा पुरवणे असे उपक्रम सुरू आहेत. सी.पी.आर. रुग्णालयाला महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी भाजपच्या वतीने एक हजार मास्क दिले आहेत. हे काम करीत असताना पाटील हे कोल्हापुरात नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर