शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

CoronaVirus Lockdown : ३५०० कर्मचारी भरउन्हात म्हणून ३९ लाख नागरिक घरी निवांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:21 IST

‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.

ठळक मुद्देअखंड विजेसाठी राबताहेत महावितरणचे कर्मचारीजिल्ह्यात ११ लाख २६ हजार वीज ग्राहकांना सेवा

नसिम सनदीकोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.महावितरणकडून जिल्ह्यातील ११ लाख २६ हजार ४१७ ग्राहकांना विजेचा नियमित पुरवठा केला जातो. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असताना महावितरण मात्र अखंडपणे आपल्या कामात मग्न आहे. ‘कोरोना’पासून बचावासाठी सुरक्षा साधने, परस्परांमध्ये अंतर ठेवणे, कार्यालयात कमी कर्मचारी राहतील, अधिकारी आॅनलाईनच संपर्क साधतील, असे नियोजन करून ग्राहकांना वीज सेवा अखंडपणे सुरू राहील यासाठी दक्षता घेतली.

त्यामुळे आज लॉकडाऊनची घोषणा होऊन ९ दिवस झाले तरी कोठेही महावितरणच्या सेवाबद्दल तक्रार आली नाही. कुठे वीज पुरवठा खंडित झाला असेल तर एका तासाच्या आत ते काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी अशा ग्राहकांना वीज पुरवण्यासाठी वायरमन, आॅपरेटर, इंजिनिअर हे प्रत्यक्ष फील्डवर तर कार्यालयात काम करण्यासाठी रोज तीन ते चार कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास राखीव कर्मचारीही तयार आहेत. या सर्वांना अत्यावश्यक सेवेचे पास दिले आहेत.मास्क व सॅनिटायझरसाठी एक हजार रुपयेमास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना महावितरणकडून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत.पोलिसांकडून दंडाची पावतीअत्यावश्यक सेवा बजावत असतानाही पोलिसांकडून अडवणूक होण्याचे प्रकार घडू लागल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. जयसिंगपूरमध्ये असाच वीज पुरवठा सुरळीत करून परतत असताना पोलिसांनी गाडी रोखून दंडाची पावतीही फाडली आहे.‘महावितरण’कडून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली जात आहे. ग्राहकांना अखंड सेवा देतानाच या कर्मचाऱ्यांना मास्कसह अन्य सुरक्षा साधने दिली आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कदर करावी एवढीच अपेक्षा आहे.सागर म्हारुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर