शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

CoronaVirus Lockdown : ३५०० कर्मचारी भरउन्हात म्हणून ३९ लाख नागरिक घरी निवांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:21 IST

‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.

ठळक मुद्देअखंड विजेसाठी राबताहेत महावितरणचे कर्मचारीजिल्ह्यात ११ लाख २६ हजार वीज ग्राहकांना सेवा

नसिम सनदीकोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.महावितरणकडून जिल्ह्यातील ११ लाख २६ हजार ४१७ ग्राहकांना विजेचा नियमित पुरवठा केला जातो. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असताना महावितरण मात्र अखंडपणे आपल्या कामात मग्न आहे. ‘कोरोना’पासून बचावासाठी सुरक्षा साधने, परस्परांमध्ये अंतर ठेवणे, कार्यालयात कमी कर्मचारी राहतील, अधिकारी आॅनलाईनच संपर्क साधतील, असे नियोजन करून ग्राहकांना वीज सेवा अखंडपणे सुरू राहील यासाठी दक्षता घेतली.

त्यामुळे आज लॉकडाऊनची घोषणा होऊन ९ दिवस झाले तरी कोठेही महावितरणच्या सेवाबद्दल तक्रार आली नाही. कुठे वीज पुरवठा खंडित झाला असेल तर एका तासाच्या आत ते काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी अशा ग्राहकांना वीज पुरवण्यासाठी वायरमन, आॅपरेटर, इंजिनिअर हे प्रत्यक्ष फील्डवर तर कार्यालयात काम करण्यासाठी रोज तीन ते चार कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास राखीव कर्मचारीही तयार आहेत. या सर्वांना अत्यावश्यक सेवेचे पास दिले आहेत.मास्क व सॅनिटायझरसाठी एक हजार रुपयेमास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना महावितरणकडून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत.पोलिसांकडून दंडाची पावतीअत्यावश्यक सेवा बजावत असतानाही पोलिसांकडून अडवणूक होण्याचे प्रकार घडू लागल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. जयसिंगपूरमध्ये असाच वीज पुरवठा सुरळीत करून परतत असताना पोलिसांनी गाडी रोखून दंडाची पावतीही फाडली आहे.‘महावितरण’कडून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली जात आहे. ग्राहकांना अखंड सेवा देतानाच या कर्मचाऱ्यांना मास्कसह अन्य सुरक्षा साधने दिली आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कदर करावी एवढीच अपेक्षा आहे.सागर म्हारुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर