शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

CoronaVirus : दोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणारपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.कोरोनाह्णचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व गर्दीची ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. आठवडी बाजारासह शहरातील भाजी मंडईमध्ये मोठी गर्दी असते. येथे संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळेच लॉकडाऊनपूर्वीच भाजी मंडई बंद करण्यात आल्या आहेत.

भाजीपाला हा जीवनाश्यक वस्तू असल्याने त्याची खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू राहिली. मात्र, आठवडी बाजार अथवा भाजी मंडईमध्ये न करता रस्त्यावर सामाजिक अंतर पाळून खरेदी-विक्री सुरू आहे. कोल्हापूर शहरातील दुकानांसह इतर व्यवहार सध्या विहीत वेळेत सुरू आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर भाजीपाला विक्री करणे तसे अडचणीचे ठरणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी कपिलतीर्थ मार्केटपासून झाली.कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र विक्रेते फारच कमी होते. गेली दोन महिने मंडई बंद असल्याने भाजीपाला नाही, त्यात सोमवारी रमजान ईदमुळे कोल्हापूर बाजार समितीमधील भाजीपाल्याचे सौदे बंद राहिले. त्यामुळे सोमवारी कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र दोन-चार विक्रेतेच आले होते. त्यांच्याकडेही मोजक्याच भाज्या दिसत होत्या.आठवडी बाजार सुरू कधी होणार?आजूबाजूच्या आठ-दहा गावांच्या सोयीसाठी मोठ्या गावांत आठवडी बाजार भरविले जातात. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने हे बाजार कार्यरत असले तरी गेली दोन महिने ते बंद आहेत. शहरातील भाजी मंडई सुरू झाल्याने आठवडी बाजारही सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. 

कोल्हापूर शहरातील सर्व व्यवहार अटीस अधीन राहून सुरू आहेत. त्यानुसार भाजी मंडईही टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न असून कपिलतीर्थ मंडई सुरू केली.- मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, मनपा कोल्हापूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरMarketबाजार