शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांनंतर कपिलतीर्थ मार्केट सुरू: उर्वरित टप्प्या-टप्प्याने सुरू होणारपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई बंद आहेत. मात्र, पावसाळा जवळ आल्याने रस्त्यावरील भाजी मंडई अडचणीच्या ठरू शकतात, म्हणून कपिलतीर्थ मार्केट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.कोरोनाह्णचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व गर्दीची ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. आठवडी बाजारासह शहरातील भाजी मंडईमध्ये मोठी गर्दी असते. येथे संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळेच लॉकडाऊनपूर्वीच भाजी मंडई बंद करण्यात आल्या आहेत.

भाजीपाला हा जीवनाश्यक वस्तू असल्याने त्याची खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू राहिली. मात्र, आठवडी बाजार अथवा भाजी मंडईमध्ये न करता रस्त्यावर सामाजिक अंतर पाळून खरेदी-विक्री सुरू आहे. कोल्हापूर शहरातील दुकानांसह इतर व्यवहार सध्या विहीत वेळेत सुरू आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर भाजीपाला विक्री करणे तसे अडचणीचे ठरणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील भाजी मंडई टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी कपिलतीर्थ मार्केटपासून झाली.कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र विक्रेते फारच कमी होते. गेली दोन महिने मंडई बंद असल्याने भाजीपाला नाही, त्यात सोमवारी रमजान ईदमुळे कोल्हापूर बाजार समितीमधील भाजीपाल्याचे सौदे बंद राहिले. त्यामुळे सोमवारी कपिलतीर्थ मार्केट सुरू झाले मात्र दोन-चार विक्रेतेच आले होते. त्यांच्याकडेही मोजक्याच भाज्या दिसत होत्या.आठवडी बाजार सुरू कधी होणार?आजूबाजूच्या आठ-दहा गावांच्या सोयीसाठी मोठ्या गावांत आठवडी बाजार भरविले जातात. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने हे बाजार कार्यरत असले तरी गेली दोन महिने ते बंद आहेत. शहरातील भाजी मंडई सुरू झाल्याने आठवडी बाजारही सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. 

कोल्हापूर शहरातील सर्व व्यवहार अटीस अधीन राहून सुरू आहेत. त्यानुसार भाजी मंडईही टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा प्रयत्न असून कपिलतीर्थ मंडई सुरू केली.- मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, मनपा कोल्हापूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरMarketबाजार