शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

corona virus -कोरोनामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:36 IST

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देकोरोनामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकटकर्फ्यूमुळे सर्व बसेस बंद : आठ लाखांचे नुकसान

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले.कोरोनो विषाणूमुळे राज्य शासनाने नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तसेच भीतीमुळे स्थानिक नागरिकही फारसे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बस प्रवाशांची संख्या कमी झाली असून, बसेसची संख्या कमी केली आहे.

परिणामी केएमटीला रोज लाखोंचा तोटा होत आहे. यामध्येच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. बस, रेल्वे, एस.टी. बससेवा बंद ठेवण्यात आली होती. के.एम.टी.च्या १०१ बसेस शास्त्रीनगर, बुद्धगार्डन येथील वर्कशॉपमध्ये थांबून होत्या.उत्पन्न नाहीच, तोटा वाढतोयबस बंद राहिल्याने रविवारी आठ लाखांचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांमध्ये अशा प्रकारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने आज, सोमवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे बससेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार निघणे अवघड जाणार आहे.

‘केएमटी’कडून आपत्कालीन पथककर्फ्यूमुळे जरी बस बंद असल्या तरी रविवारी केएमटी प्रशासनाकडून १० कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन पथक नियुक्त केले होते. सार्वजानिक वाहतूक सेवा बंद असल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांना या पथकाने केएमटी बसमधून ‘सीपीआर’मध्ये आणून सोडले. दिवसभरात १४ प्रवाशांना सेवा देण्यात आली. या पथकामध्ये प्रमोद पाटील यांच्यासह पाच चालक, पाच वाहक होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर