शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

corona virus : कोल्हापुरात ९०२ नवीन रुग्ण, २७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अपुऱ्या यंत्रणेसह कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य प्रशासनाने आता मात्र कोरोनासमोर हात टेकले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात ९०२ नवीन रुग्ण, २७ जणांचा मृत्यूजनता कर्फ्यूबाबत जनतेत संदिग्धता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अपुऱ्या यंत्रणेसह कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य प्रशासनाने आता मात्र कोरोनासमोर हात टेकले आहेत. एकीकडे बेड उपलब्ध करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे बाधितांची संख्या मात्र घटायचे नाव घेईना. गुरुवारी जिल्ह्यात ९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ जणांचा मृत्यू झाला.एकीकडे कोरोना दिवसेंदिवस उग्र रूप दाखवीत असताना जिल्ह्यातील जनता मात्र तितकीशी गांभीर्याने वागत असल्याचे चित्र नाही. जिल्ह्याच्या तीन-चार तालुक्यांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता कोल्हापूर शहरातही तो पाळावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दोन दिवसांपूर्वी केले. परंतु त्याला काही व्यापारी, रिक्षा संघटनांचा विरोध होत आहे.

सर्वसामान्य जनतेची जनता कर्फ्यू लागू करण्याची तयारी असताना, दुसऱ्या बाजूने काहीजण त्याला खोडा घालत आहेत; त्यामुळे कोल्हापुरात, शुक्रवारपासून होणाऱ्या जनता कर्फ्यूबाबत संदिग्ध वातावरण आहे.जिल्ह्यात कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांत कोरोनाचा उद्रेक मोठा आहे. इचलकरंजी शहरातील नवीन वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यांत रुग्णसंख्या घटत असली तरी साखळी काही तुटत नाही. नवीन रुग्ण समोर येतच आहेत. कोल्हापूर शहराची परिस्थिती तर अगदीच खराब आहे. कोल्हापूर शहराने रुग्णांचा दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे.जिल्ह्यात नवीन नोंद झालेल्या ९०२ रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३२ हजार ५२२ वर गेली आहे, तर मागच्या २४ तासांतील २७ जणांच्या मृत्यूमुळे हा आकडा ९८५ पर्यंत पोहोचला आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर