शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

corona virus : कोल्हापुरात २२ जणांचा मृत्यू, ४९० नवीन रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:06 IST

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन व्हायला आता काही तास बाकी राहिले असताना कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे विघ्न मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला, तर ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्याने आता पाचशेचा टप्पा ओलंडला असून तो ५२१ वर जाऊन पोहचला आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात २२ जणांचा मृत्यू४९० नवीन रुग्णांची नोंद

कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन व्हायला आता काही तास बाकी राहिले असताना कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे विघ्न मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला, तर ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्याने आता पाचशेचा टप्पा ओलंडला असून तो ५२१ वर जाऊन पोहचला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे गुरुवारच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. समाधानाची एक बाब म्हणजे जेवढे नवीन रुग्ण वाढत आहेत, तेवढेच बरे होऊन घरी जात आहेत. मात्र नवीन येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण अद्यापही कायम आहे.जिल्ह्यात आता एकूण १६ हजार ७७२ एवढी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या ५२१ च्या घरात गेली आहे. कोल्हापूर सारख्या निसर्ग संपन्न जिल्ह्याला कोरोना संसर्गाने आपल्या विळख्यात घेतले असून हा विळखा दिवसे दिवस घट्ट होत आहे. जिल्हा व आरोग्य प्रशासन जोरदार प्रयत्न करत असले तरी त्यांचे प्रयत्न आता अपूरे पडू लागले आहेत.कोरोनाच्या चाचण्या वाढविल्या असल्या तरी कोरोनाची साखळी तोडण्याचे काम सध्या थांबले आहे. गणेशोत्सव, मोहरम आता सुरु होत असून विविध ठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. नागरीकही आता फारशी काळजी घेताना दिसत नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर