शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

corona in kolhapur : आजरा तालुक्यातील पॉझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील २८ जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:33 IST

आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

ठळक मुद्देकोरोना पॉझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील २८ जण क्वारंटाईन कोल्हापूर येथे स्वॅब तपासणीसाठी पाठविले

सदाशिव मोरेआजरा : आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

लॉकडाऊनमधील जनजीवन सुरळीत होत असतानाच हारुरमध्ये कोरोनाचे पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सर्वच गावांमध्ये स्मशानशांतता पसरली असून भितीयुक्त वातावरण आहे.मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल ( बी.डी.डी.चाळ मुंबई ) यांच्या मोठ्या मुलाचे मंगळवार दि. ५ मे रोजी निधन झाले. त्याचा मृतदेह घेवून मुंबईतून चौघेजण हारुर येथे बुधवार दि. ६ मे रोजी आले.  ग्रामस्थांनी मृतदेह गावात घेण्यास विरोध केल्याने गावाबाहेरील स्मशानभूमीत भाऊबंद व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणेत आले.अ‍ॅब्युलन्समधील तिघांचे गुरुवारी गडहिंग्लज येथे स्वॅब घेणेत आले. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असलेली आई व मुलगा पॉझिटिव्ह तर सोबत असणारी भावजयीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आई व मुलाला सी.पी.आर.हॉस्पीटल कोल्हापूर येथे तर भावजयीवर आजऱ्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.हारुरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याने सकाळपासूनच तहसिलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी गावातच तळ ठोकून माहिती घेण्यास सुरुवात केली. आरोग्य सेवक, आशा व अंगणवाडी सेविकांच्यामार्फत सर्व्हे करण्यात आला.

पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या भाऊबंद व नातेवाईक यांची माहिती दुपारी दोनपर्यंत गोळा केली. त्यानंतर आजरा येथील केव्हीड सेंटरमध्ये डॉ.अशोक फर्नांडीस व डॉ. राऊत यांनी तपासणी करुन त्यांच्या घशातील स्वॅब काढण्यात आले.हारुरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज प्रशासनाने हारुर गावाच्या सात कि. मी. चार परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषीत केला. सात कि. मी.च्या १४ गावातील सर्व गावांचे प्रवेशद्वार बंद करुन लॉकडाऊन केले आहे.त्यापाठोपाठ आजरा तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून सर्व गावांच्या सीमा बंद करणेत आल्या आहेत. हारुरच्या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र भितीयुक्त वातावरण पसरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर