शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

corona in kolhapur-‘रमजान’ची नमाज पठण, इफ्तार सार्वजनिकरित्या करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:01 IST

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावयाचे आहे. ...

ठळक मुद्दे‘रमजान’ची नमाज पठण, इफ्तार सार्वजनिकरित्या करू नकाघरातच धार्मिक कार्य करा; ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे निर्देश

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावयाचे आहे.

कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये आणि घराच्या अथवा इमारतीच्या छतावर, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, तरावीह, इफ्तार करण्यात येऊ नये. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित धार्मिक कार्य पार पाडावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव असणार आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह आणि इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावेत.

‘लॉकडाऊन’विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा या निर्देशामध्ये समावेश आहे. या सूचनांची माहिती मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांना देण्यात याव्यात, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना रविवारी पत्राद्वारे दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार लॉकडाऊनच्या कालावधीत कोल्हापूरमधील सर्व मशिदी बंद राहणार आहेत. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ पाचजण नमाज अदा करतील. समाजबांधवांनी आपल्या घरातच तरावीहचे पठण करावे. बाहेरील व्यक्तीला घरात घेऊन तरावीहचे पठण करू नये. सार्वजनिकरित्या नमाज पठण, इफ्तार पार्टीचे आयोजन करू नये, असे आवाहन आम्ही शासनाचा आदेश येण्यापूर्वीच केले आहे.-गणी आजरेकर, चेअरमन, मुस्लिम बोर्डिंग

 

आरोग्य, जीवनाच्या हिताचेरमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग अथवा संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लिम समाज बांधवांच्या आरोग्य आणि जीवनाच्या हिताचे असल्याचे अल्पसंख्याक विकास विभागाच्या रविवारच्या पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamadanरमजानkolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम