कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजे २११, त्याखालोखाल १३१ करवीर तालुका आणि त्यानंतर ८२ हातकणंगले तालुका अशी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात दिवसभरामध्ये १४३८ जणांची तपासणी टेस्ट करण्यात आली असून, २१८८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १५७९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे, तर ७७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चौकट
मृतांमध्ये २५ पुरुष
गेल्या २४ तासांत झालेल्या ४१ मृत्यूंपैकी २५ जण पुरुष आहेत.
हातकणंगले १६
अंबप येथील दोन, शहापूर, कोरोची स्टेशन, पाटील मळा शहापूर, साजणी, इचलकरंजी, हुपरी, रुई, तळसंदे, लाटवडे, गणेशनगर आणि हातकणंगले, चंदूर रोड, माणगाव या गावच्या १६ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.
कोल्हापूर मूत्यू ६
मंगळवार पेठ, नेहरू नगर, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, फुलेवाडी, राजारामपुरी
करवीर मृत्यू ५
पाचगाव, गिरगाव, सांगवडेवाडी, हळदी, कणेरी
शिरोळ मृत्यू ३
नांदणी, जयसिंगपूर, गल्ली नं. ७ जयसिंगपूर
गडहिंग्लज मृत्यू २
कडगाव, नांगनूर
कागल १
कसबा सांगाव
पन्हाळा १
कोडोली
इतर जिल्हे ६
इतर जिल्ह्यातील सांगली येथील दोन, पुणे, रत्नागिरी येथील दोन, सिंधुदुर्ग अशा सहाजणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
मृत्युदर रोखायचा कसा
कोल्हापूरचा मृत्युदर जास्त असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआरमध्ये बैठक घेऊन तो रोखण्याचे आवाहन केले होते. परंतु, सोमवारी हातकणंगले या एकाच तालुक्यातील १६ जणांचा मृत्यू झाल्याने आता आयजीएम रुग्णालयाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार असून, एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू का होता आहे हे आरोग्य यंत्रणेला पाहावे लागणार आहे.