शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

कोरोनामुळे चोरटेही झाले घरबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदी पुकारल्याने घराबाहेर कोणीही न पडताच सारे कुटुंबच घरात राहिले. चोरट्यांनाही चोऱ्या करण्यात मर्यादा ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदी पुकारल्याने घराबाहेर कोणीही न पडताच सारे कुटुंबच घरात राहिले. चोरट्यांनाही चोऱ्या करण्यात मर्यादा आल्या. त्यामुळे चोरटेही घरबंद झाल्याची स्थिती आहे. परिणामी दरोडा, जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या प्रमाणात घट झाली असली तरीही वाहने चोरीच्या घटनेत मात्र नेहमीपेक्षा कमालीची वाढ झाल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र आहे.

कोरोना संसर्ग वाढल्याने संचारबंदी पुकारली . नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास प्रतिबंध केले. परिणामी, नागरिकांनी घरीच थांबून राहणे पसंद केले. कुटुंबाचे सारेच सदस्य घरी राहिल्याने चोरट्यांना ही घरफोडी, जबरी चोऱ्या करण्यात मर्यादा आल्या, परिणामी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यात चोऱ्याचे प्रमाण घटले आहे. पण चोरट्यांनी दुचाकी वाहने चोरण्याचा मात्र सपाटा लावल्याने दुचाकी चोरीचा आलेख कमालीचा वाढल्याची गंभीर बाब आहे.

पॉईंटर...

- २०१९ मध्ये झालेल्या चोरीच्या एकूण घटना : १५९२

(दरोडा : २८, जबरी चोरी : १५१, घरफोडी चोरी : ३९८, इतर चोरी : १०१५)

- २०२० मध्ये झालेल्या चोरीच्या एकूण घटना : १२८६

(दरोडा : ११, जबरी चोरी : १०८, घरफोडी चोरी : २८७, इतर चोरी : ८८०)

- एप्रिल २०२१ पर्यंत झालेल्या चोरीच्या घटना : ५८०

(दरोडा : ०१, जबरी चोरी : ४२, घरफोडी चोरी : ७८, इतर चोरी : ४५७)

खुनाच्या घटना वाढल्या

संचारबंदीत कौटुंबिक कलह वाढण्याच्या घटना घडल्या तशा खुनाच्या प्रयत्नाच्या ही घटनामध्ये वाढ झाली. २०१९ मध्ये ४८ खुनाच्या घटना घडल्या, तर २०२० मध्ये ४६ घटना घडल्या. जानेवारी ते मार्च २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ०६ खुनाच्या घटना जादा घडल्या. तर खुनाचे प्रयत्नाच्या घटनात ही वाढ झाली. जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत एकूण १७ खुनाच्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे.

बलात्कारही वाढले...

संचारबंदीच्या कालावधीत महिला व मुलींवरील बलात्काराचे ही प्रमाण वाढल्याचे पोलीस दप्तरातील नोंदीवरुन दिसून येत आहे. २०१९ मध्ये बलात्काराच्या एकूण १२८ तर २०२० मध्ये ११५ घटना घडल्या. जानेवारी ते मार्च २०२० च्या तुलतेन २०२१ मध्ये पहिल्या तीन महिन्यात तब्बल १२ घटनांची जादा नोंद झाली आहेत. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात तब्बल ३९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

कोट...

संचारबंदीत सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर तर, नागरिक घरीच राहिल्याने चोरीच्या घटनात घट झाली. पण कौटुंबिक कलहाच्या घटना वाढल्या, महिलावरील अत्याचाराचे ही प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे महिलांनी अन्यायाविरुद्ध तक्रारीसाठी धाडसांनी पुढे यावे - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा