शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कोरे- शेट्टी दिलजमाई

By admin | Updated: February 4, 2017 00:03 IST

आमने-सामने बसून चर्चा : जिल्हा परिषदेच्या निमित्ताने वाढली जवळीक

कोल्हापूर : पारंपरिक विरोधक असलेल्या विनय कोरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निमित्ताने भाजपच्या पुढाकाराने जवळीक निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी सकाळी हॉटेल रेसिडेन्सी येथे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत कोरे आणि शेट्टी यांनी आमनेसामने बसून चर्चा केली. खुद्द कोरे यांनी दोघांनाही एकमेकांच्या भूमिका समजल्या आहेत, असे सांगत ही जवळीक स्पष्ट केली. गेल्या पंधरा वर्षांत एकीकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीसोबत जाईल तिथे जनसुराज्य सोबत असे. त्यामुळे जिल्हा बॅँकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत अनेक पदे जनसुराज्यला मिळाली. एवढेच नव्हे, तर कोल्हापूरचा महापौरसुद्धा बनविण्यात कोरे यांना यश आले. वारणा उद्योगसमूहाचा प्रभाव हा पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांत असल्याने साहजिकच या ठिकाणी राजकीय ताकद वाढविण्याचा कोरे यांनी नेहमीच प्रयत्न केला. राजू आवळे यांच्या रूपाने हातकणंगलेतून ‘जनसुराज्य’ने आमदारकीही कमावली होती; परंतु जेव्हा-जेव्हा लोकसभा आणि साखर हंगामाचा प्रश्न समोर येई, तेव्हा-तेव्हा कोरे शेट्टी यांच्याविरोधात कार्यरत असत.दरवर्षी हंगाम सुरू करण्यावरून त्यांच्यात आणि ‘स्वाभिमानी’मध्ये संघर्ष ठरलेला असे. वारणा साखर कारखान्याची वाहने अडवून पंक्चर करण्यात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी कधीही कसूर ठेवली नव्हती; परंतु कोरे यांनीही काही वेळा जशास तशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर अनेक वेळा वारणा परिसरात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत होता. त्यामुळे कोरे आणि शेट्टी यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिले नव्हते. परंतु, तीन महिन्यांपूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांआधी विनय कोरे यांनी राज्याच्या सत्तेतील सहावा पक्ष म्हणून प्रवेश केल्याने काही संदर्भ बदलायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यातील एक पाऊल पुढे जात समन्वयासाठी प्रसिद्ध असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरे आणि शेट्टी यांना एकत्र आणले. जिल्हा परिषदेसाठी स्वाभिमानी ‘भाजता’मध्ये सहभागी होणार की नाही, हे स्पष्ट नसले तरी कोरे यांच्या तोंडून शेट्टींसोबतच्या झालेल्या चर्चेबाबत अतिशय सकारात्मक बोल बाहेर पडले आहेत.शेट्टी आणि माझी भूमिका त्या-त्या ठिकाणी योग्यआम्ही राज्यातील सत्तेत सहावा पक्ष म्हणून सहभागी झालो. नगरपालिकेला कोल्हापूर जिल्ह्यात भाजपसोबत काम केले. त्यात चांगले यश मिळाले. आम्ही सर्वजण एकत्र असताना सोबत असणाऱ्या ‘स्वाभिमानी’शी चर्चा होत नव्हती. मात्र, आज त्याबाबत चर्चा झाली. गावपातळीवर आमच्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे; परंतु व्यापक हित लक्षात घेऊन काही निर्णय घेतले. १४ जागा आम्ही मागितल्या आहेत.एखाद-दुसऱ्या ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढतही होईल; परंतु शेतकऱ्यांचे नेते म्हणून शेट्टी आणि याच शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून माझी अशा दोघांच्याही भूमिका त्या-त्या ठिकाणी योग्य होत्या. दोघांच्याही पक्षांची ग्रामीण जनतेशी नाळ जुळली आहे. त्यामुळे देशहितासाठी म्हणून एकत्र काम करण्याच्या प्रक्रियेला चांगली सुरुवात झाली. काहीतरी विधायक घडविण्यासाठी सर्वांची संघटित ताकद वाढवूया, यावर एकमत झाले.