शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरे- शेट्टी दिलजमाई

By admin | Updated: February 4, 2017 00:03 IST

आमने-सामने बसून चर्चा : जिल्हा परिषदेच्या निमित्ताने वाढली जवळीक

कोल्हापूर : पारंपरिक विरोधक असलेल्या विनय कोरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निमित्ताने भाजपच्या पुढाकाराने जवळीक निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी सकाळी हॉटेल रेसिडेन्सी येथे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत कोरे आणि शेट्टी यांनी आमनेसामने बसून चर्चा केली. खुद्द कोरे यांनी दोघांनाही एकमेकांच्या भूमिका समजल्या आहेत, असे सांगत ही जवळीक स्पष्ट केली. गेल्या पंधरा वर्षांत एकीकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीसोबत जाईल तिथे जनसुराज्य सोबत असे. त्यामुळे जिल्हा बॅँकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत अनेक पदे जनसुराज्यला मिळाली. एवढेच नव्हे, तर कोल्हापूरचा महापौरसुद्धा बनविण्यात कोरे यांना यश आले. वारणा उद्योगसमूहाचा प्रभाव हा पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांत असल्याने साहजिकच या ठिकाणी राजकीय ताकद वाढविण्याचा कोरे यांनी नेहमीच प्रयत्न केला. राजू आवळे यांच्या रूपाने हातकणंगलेतून ‘जनसुराज्य’ने आमदारकीही कमावली होती; परंतु जेव्हा-जेव्हा लोकसभा आणि साखर हंगामाचा प्रश्न समोर येई, तेव्हा-तेव्हा कोरे शेट्टी यांच्याविरोधात कार्यरत असत.दरवर्षी हंगाम सुरू करण्यावरून त्यांच्यात आणि ‘स्वाभिमानी’मध्ये संघर्ष ठरलेला असे. वारणा साखर कारखान्याची वाहने अडवून पंक्चर करण्यात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी कधीही कसूर ठेवली नव्हती; परंतु कोरे यांनीही काही वेळा जशास तशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर अनेक वेळा वारणा परिसरात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत होता. त्यामुळे कोरे आणि शेट्टी यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिले नव्हते. परंतु, तीन महिन्यांपूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांआधी विनय कोरे यांनी राज्याच्या सत्तेतील सहावा पक्ष म्हणून प्रवेश केल्याने काही संदर्भ बदलायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यातील एक पाऊल पुढे जात समन्वयासाठी प्रसिद्ध असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरे आणि शेट्टी यांना एकत्र आणले. जिल्हा परिषदेसाठी स्वाभिमानी ‘भाजता’मध्ये सहभागी होणार की नाही, हे स्पष्ट नसले तरी कोरे यांच्या तोंडून शेट्टींसोबतच्या झालेल्या चर्चेबाबत अतिशय सकारात्मक बोल बाहेर पडले आहेत.शेट्टी आणि माझी भूमिका त्या-त्या ठिकाणी योग्यआम्ही राज्यातील सत्तेत सहावा पक्ष म्हणून सहभागी झालो. नगरपालिकेला कोल्हापूर जिल्ह्यात भाजपसोबत काम केले. त्यात चांगले यश मिळाले. आम्ही सर्वजण एकत्र असताना सोबत असणाऱ्या ‘स्वाभिमानी’शी चर्चा होत नव्हती. मात्र, आज त्याबाबत चर्चा झाली. गावपातळीवर आमच्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे; परंतु व्यापक हित लक्षात घेऊन काही निर्णय घेतले. १४ जागा आम्ही मागितल्या आहेत.एखाद-दुसऱ्या ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढतही होईल; परंतु शेतकऱ्यांचे नेते म्हणून शेट्टी आणि याच शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून माझी अशा दोघांच्याही भूमिका त्या-त्या ठिकाणी योग्य होत्या. दोघांच्याही पक्षांची ग्रामीण जनतेशी नाळ जुळली आहे. त्यामुळे देशहितासाठी म्हणून एकत्र काम करण्याच्या प्रक्रियेला चांगली सुरुवात झाली. काहीतरी विधायक घडविण्यासाठी सर्वांची संघटित ताकद वाढवूया, यावर एकमत झाले.