शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

कोपार्डेत अटीतटीची तिरंगी लढत

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले

कोपार्डे : जनावरांच्या बाजारामुळे जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे समोर असलेल्या सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील व माजी सदस्य एस. के. पाटील यांच्यामध्ये अटीतटीची दुरंगी लढत होणार, असे चित्र स्पष्ट असले तरी लोकसभेचे अपक्ष उमेदवार बजरंग पाटील यांनीही चार प्रभागांत आपले सात उमेदवार उभे करून तिरंगी काटा लढतीचे चित्र निर्माण केले आहे. विकासासाठी एकमुखी बहुमत द्यावे, हा एकच नारा घेऊन मतदारांसमोर कारभारी गेले आहेत.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विलास पाटील यांनी सात जागा मिळवत बहुमत मिळविले. मात्र, सरपंचपदाचे मागासवर्गीय आरक्षण असल्याने आणि विलास पाटील गटाची एकही मागासवर्गीय महिला निवडून न आल्याने बहुमत नसतानाही एस. के. पाटील गटाच्या मंगल कांबळे यांना सरपंचपद देणे भाग पडले. येथून राजकीय अटीतटीला सुरुवात झाली. दोन्ही गटांच्या राजकीय इर्ष्येने विकासापेक्षा एकमेकांचे उट्टे काढण्याला सुरुवात झाली. यातून अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस एकमेकांविरुद्ध देण्यापर्यंत मजल गेली. ग्रामसभेत हेवेदावे काढून विकासाचे निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. यातून अडीच कोटींची पेयजल योजना पाच वर्षांपासून लोंबकळत पडली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले, पण श्रेयवादातून साधा ठराव ग्रामपंचायत सदस्यांना आ. नरके यांना देता न आल्याने मंदिराचे काम रखडले आहे.ग्रामस्थांच्या जिव्हाळ््याचा प्रश्न म्हणजे प्लॉट वाटप. यातही राजकीय श्रेयवादाचा प्रश्न करून आता लोकसंख्या वाढल्याने जागेसाठी अडचणीत सापडले. एकूणच गेल्या पाच वर्षांत योजना आल्या दारी पण राजकीय अनिच्छा पडली भारी. यामुळे विकासालाच खो बसला आहे.आता ग्राम पंचायतीत बहुमतात व सत्तेत असणारे दोन गट आमने-सामने आले आहेत. या दोन्ही गटांनीही विकास हवा असेल, तर स्पष्ट बहुमताबरोबर सरपंच आरक्षण असलेल्या उमेदवारालाही निवडणूक द्या, अन्यथा कोणतेच काम होऊ शकणार नाही, अशी हाक मतदारांना द्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही गट आपणच गावचा विकास करणार, असा नारा करीत असले, तरी हे दोन्ही गट आपल्या राजकीय स्वार्थापोटी विकासाचा गळा घोटत आहेत, असा आरोप करीत लोकसभेचे उमेदवार पै. बजरंग पाटील यांनी चार प्रभागांत सात उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे. तर विद्यमान उपसरपंच सागर जामदार हे विलास गटातून उमेदवारी न मिळाल्याने आपली पत्नी रूपाली जामदार यांना रिंगणात उतरविले आहे. एकूणच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या गटातच दुरंगी लढत होणार असली, तरी पै. बजरंग पाटील यांच्या पॅनेलचा गटाला फायदा किंवा तोटा होणार, तर सागर जामदार आली आपली ताकद इतर प्रभागात कोणाला देणार, यावरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)