शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोपार्डेत अटीतटीची तिरंगी लढत

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले

कोपार्डे : जनावरांच्या बाजारामुळे जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे समोर असलेल्या सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील व माजी सदस्य एस. के. पाटील यांच्यामध्ये अटीतटीची दुरंगी लढत होणार, असे चित्र स्पष्ट असले तरी लोकसभेचे अपक्ष उमेदवार बजरंग पाटील यांनीही चार प्रभागांत आपले सात उमेदवार उभे करून तिरंगी काटा लढतीचे चित्र निर्माण केले आहे. विकासासाठी एकमुखी बहुमत द्यावे, हा एकच नारा घेऊन मतदारांसमोर कारभारी गेले आहेत.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विलास पाटील यांनी सात जागा मिळवत बहुमत मिळविले. मात्र, सरपंचपदाचे मागासवर्गीय आरक्षण असल्याने आणि विलास पाटील गटाची एकही मागासवर्गीय महिला निवडून न आल्याने बहुमत नसतानाही एस. के. पाटील गटाच्या मंगल कांबळे यांना सरपंचपद देणे भाग पडले. येथून राजकीय अटीतटीला सुरुवात झाली. दोन्ही गटांच्या राजकीय इर्ष्येने विकासापेक्षा एकमेकांचे उट्टे काढण्याला सुरुवात झाली. यातून अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस एकमेकांविरुद्ध देण्यापर्यंत मजल गेली. ग्रामसभेत हेवेदावे काढून विकासाचे निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. यातून अडीच कोटींची पेयजल योजना पाच वर्षांपासून लोंबकळत पडली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले, पण श्रेयवादातून साधा ठराव ग्रामपंचायत सदस्यांना आ. नरके यांना देता न आल्याने मंदिराचे काम रखडले आहे.ग्रामस्थांच्या जिव्हाळ््याचा प्रश्न म्हणजे प्लॉट वाटप. यातही राजकीय श्रेयवादाचा प्रश्न करून आता लोकसंख्या वाढल्याने जागेसाठी अडचणीत सापडले. एकूणच गेल्या पाच वर्षांत योजना आल्या दारी पण राजकीय अनिच्छा पडली भारी. यामुळे विकासालाच खो बसला आहे.आता ग्राम पंचायतीत बहुमतात व सत्तेत असणारे दोन गट आमने-सामने आले आहेत. या दोन्ही गटांनीही विकास हवा असेल, तर स्पष्ट बहुमताबरोबर सरपंच आरक्षण असलेल्या उमेदवारालाही निवडणूक द्या, अन्यथा कोणतेच काम होऊ शकणार नाही, अशी हाक मतदारांना द्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही गट आपणच गावचा विकास करणार, असा नारा करीत असले, तरी हे दोन्ही गट आपल्या राजकीय स्वार्थापोटी विकासाचा गळा घोटत आहेत, असा आरोप करीत लोकसभेचे उमेदवार पै. बजरंग पाटील यांनी चार प्रभागांत सात उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे. तर विद्यमान उपसरपंच सागर जामदार हे विलास गटातून उमेदवारी न मिळाल्याने आपली पत्नी रूपाली जामदार यांना रिंगणात उतरविले आहे. एकूणच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या गटातच दुरंगी लढत होणार असली, तरी पै. बजरंग पाटील यांच्या पॅनेलचा गटाला फायदा किंवा तोटा होणार, तर सागर जामदार आली आपली ताकद इतर प्रभागात कोणाला देणार, यावरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)