शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

सहकाराभिमुख ‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:18 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को- ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को- आॅप. बॅँकेने गेल्या शंभर वर्षांत गरुडभरारी घेतली आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात या बॅँकेने आदर्शवत कामगिरीने एक वेगळाच दबदबा निर्माण केला असून, राज्यातील पगारदार नोकरांच्या बॅँकांत गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँक नंबर वन राहिली आहे.पगारदार कर्मचाऱ्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी हक्काची क्रेडिट सोसायटी असावी, त्यांनी सावकारांच्या दारात जाऊ नये, या उदात्त हेतूने शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून भास्करराव जाधव यांनी ३ जुलै १९१७ रोजी ‘करवीर सरकारचे नोकर लोकांची को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि., पेटा करवीर, इलाखा करवीर’ या नावाने स्थापना केली. त्यावेळी १६ जणांचे आद्यप्रवर्तक मंडळ कार्यरत झाले. केवळ ४५ सभासद, ६६९ रुपयांचे खेळते भांडवल, ३६३ रुपयांची कर्जे व २०० रुपयांच्या ठेवीवर संस्था सुरू झाली. १९२६ ते १९३६ हा दहा वर्षांचा कालखंड संस्थेच्या दृष्टीने प्रगतीचा ठरला. ३० सप्टेंबर १९३४ च्या सर्वसाधारण सभेत पतपेढीचे बॅँकेत रूपांतर केले. त्यानंतर तत्कालीन व्यवस्थापनाने मागे वळून पाहिलेच नाही. १३ जून १९८१ला लक्ष्मीपुरी येथे पहिली शाखा सुरू केली. १९७८-७९ या आर्थिक वर्षापासून मृत सभासदांच्या वारसांना कुटुंब कल्याण निधीतून ३०० रुपये याप्रमाणे बिनव्याजी आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली. गडहिंंग्लज, जयसिंगपूर, ताराबाई पार्क, बांबवडे, गारगोटी येथे शाखा सुरू करून कार्यविस्तार वाढविला. २००९ ला गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेचे राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँक असे नामांतर झाले. बॅँकेने ३ जुलै २०१६ रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले.शाहू महाराज यांच्या प्रेरणेने वाटचाल करत पारदर्शक कारभार, सभासदांशी आपुलकी जपत शंभर वर्षांत बॅँकेने आपला दबदबा कायम राखला आहे. बॅँकिंग क्षेत्रात येणाºया नवनवीन सुविधा, तंत्रज्ञान अवगत करून सभासदांपर्यंत पोहोचविण्याचे काम बॅँकेने केले. मध्यंतरीचा काळ सहकारी बॅँकांसाठी अरिष्टाचा होता. मात्र, कुशल नेतृत्व, उत्तम नियोजनाच्या बळावर बॅँकेने प्रगतीचा चढता आलेख कायम राखला. कोल्हापुरातील आठ शाखांसह सातारा, पुणे, ओरोस (सिंधुदुर्ग) येथे शाखा कार्यरत आहेत. ४५ सभासदांपासून सुरू झालेला बॅँकेचा २२ हजार सभासदांपर्यंतचा प्रवास निश्चितच आदर्शवत आहे.गौरव कारभाराचाबॅँकेला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. यामध्ये नॅशनल फेडरेशन आॅफ अर्बन को-आॅप. अँड क्रेडिट सोसायटी दिल्ली, दि महाराष्टÑ अर्बन बॅँक को-आॅप. बँक्स फेडरेशन, बॅँकिंग फं्रटीयर्स, महाराष्टÑ एम्प्लॉईज को. आॅप. बँक्स असोसिएशन, आदी दिग्गज संस्थांनी बॅँकेचा सन्मान केला. त्याचबरोबर ‘बॅँकिंग फं्रटीयर्स’तर्फे ‘बेस्ट चेअरमन’ पुरस्काराने रवींद्र पंदारे व शशिकांत तिवले यांना, ‘बेस्ट चेअरमन’, ‘बेस्ट कोअर बॅँकिंग प्रणाली’, ‘बेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पुरस्काराने सुरेश शिंदे यांना सन्मानित केले.बॅँकेची सामाजिक बांधीलकी : बॅँकेने १९४० मध्ये श्रीमंत पद्माराजे पारितोषिक निधी सुरू केला. त्यातून गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन गौरव केला जातो. गेल्यावर्षी दुष्काळात महाराष्टÑ होरपळत होता. त्यावेळी बॅँकेचे संचालक व कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निधीस १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तीनशेहून अधिक पूरग्रस्तांना मदत, परितक्त्या-निराधार-अनाथ-गरीब महिलांना प्रशिक्षित केले. अधिक ‘हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड’च्या विद्यालयास ११ हजार १११ रुपये वैयक्तिक मदत दिली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत शताब्दी वर्षात जन्म घेणाºया मुलींच्या नावे ठेव योजना राबविली.