शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीने बिघडवले स्वयंपाकाचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:29 IST

कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे तयार झालेला महागाईचा भस्मासूर आता थेट स्वयंपाकघरात शिरला आहे. स्थानिक पातळीवर पिकत असल्याने भाजीपाल्याची स्वस्ताई ...

कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे तयार झालेला महागाईचा भस्मासूर आता थेट स्वयंपाकघरात शिरला आहे. स्थानिक पातळीवर पिकत असल्याने भाजीपाल्याची स्वस्ताई सोडली, तर किचनमध्ये रोजच्या जेवणासाठी लागणारे सर्वच प्रकारचे खाद्यतेल, धान्य, कडधान्ये, डाळींच्या दरात किमान २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सर्वाधिक वाढ खाद्यतेलात झाली असून पहिल्यांदाच दराने प्रति किलो दीडशेचा टप्पा ओलांडला आहे, यात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

खाद्यतेल स्थानिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर तयार होत नसल्याने परराज्य व आयातीवर अवलंबून राहावे लागते. मालवाहतूक वाढल्याने खाद्यतेलाच्या दराने गेल्या महिन्यापासून जी उसळी घेतली, ती अजूनही कायम आहे. दोन महिन्यापूर्वी ८० रुपयांवर असणारे सरकी तेल आता १३५ वर पोहोचले आहे. ११० रुपयांवर असणाऱ्या शेंगतेलाने आता १७० रुपये पार केले आहेत. धान्य बाजारातही ज्वारी, गहू, तांदुळ, बाजरी, नाचणी यांचे दर आजवरच्या उच्चांकावर आहेत. दोन महिन्यांपूर्वी ३० ते ४० रुपयांवर असणारी शाळू ज्वारी आता ४० ते ६० रुपये किलोच्या घरात गेली आहे. गव्हाचे दर २२ ते २६ रुपयांपर्यंत खाली आले होते, ते पुन्हा ३२ ते ३६ रुपये झाले आहेत. तांदळाचे दर कमी होत असतानाच, या इंधन दरवाढीमुळे पुन्हा महागाई आणली आहे. तूरडाळ कित्येक दिवसांनंतर १०० च्या आत आली होती, ती पुन्हा १२० वर गेली आहे. मूग १२०, मसूर ८०, चवळी ८०, हरभरा डाळ ७५ असे आजचे दर आहेत.

चौकट ०१

भाजीपाल्याच्या स्वस्ताईने शेतकरी भिकेला

साधारणपणे पूर्वहंगामी, सुरू उसाच्या लावणीत व पाणी मुबलक उपलब्ध असलेल्या ठिकाणी भाजीपाल्याची मोठी लागवड होत असल्याने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात बाजारात भाजीपाल्याची स्वस्ताई असते, यावर्षीही ती दिसत आहे. वाढलेल्या महागाईचे चटके सोसणाऱ्या ग्राहकांना ही स्वस्ताई दिलासादायक असली तरी, उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र डोळ्यात अश्रू आणणारी ठरली आहे. वाढत्या उत्पादन खर्चात आता पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चातील वाढीचीही भर पडल्याने उत्पादन खर्च राहू दे, निदान वाहतूक खर्च निघेल एवढे तरी पैसे मिळावेत, एवढी अपेक्षाही आजच्या घडीला पूर्ण होताना दिसत नाही.

चौकट ०२

खाद्यतेलाच्या दरवाढीला साठेबाजीही कारणीभूत

खाद्यतेलाच्या दरवाढीमध्ये इंधन दरवाढीपेक्षाही बड्या व्यापाऱ्यांकडून होत असलेली साठेबाजी कारणीभूत असल्याची मार्केटमध्ये चर्चा आहे. मोदी सरकारने साठेबाजीवरील नियंत्रण उठविल्याने ज्यांची मोठमोठी गोडामे आहेत, अशा बड्या व्यापाऱ्यांनी माल मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवला आहे. इंधन दरवाढीचे निमित्त सांगून वाढीव दराने त्यांच्याकडून पुरवठा केला जात आहे, त्यामुळेच छोट्या व्यापाऱ्यांनाही दर वाढवून विकण्याशिवाय गत्यंतर राहिलेली नाही.

प्रतिक्रिया...

खाद्यतेलासह धान्य, कडधान्याचे दर वाढत चालले असताना, सरकार म्हणून जी जबाबदारी मोदी सरकारने घ्यायला हवी, ती घेतलेली नाही. बड्या व्यापाऱ्यांना मोकळे मैदान करून देत सर्वसामान्यांचा खिसा रिकामा केला आहे. शिवाय जीएसटी ५ वरून ८ टक्केपर्यंत वाढवला, आयात शुल्कही ८ वरून १२.५० टक्केपर्यंत वाढवले. या सर्वांचा परिणाम आज महागाई वाढण्यात झाला आहे. हे सगळे पाहिल्यावर, सरकार झोपले आहे का? असे म्हणावेसे वाटते.

- संदीप वीर, व्यापारी, कोल्हापूर