शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

टाकाळा खणीवरून वादंग

By admin | Updated: April 18, 2015 00:07 IST

कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले : महापालिका राजारामपुरीतील कचरा उठाव बंद करणार

कोल्हापूर : टाकाळा खणीत ‘लॅँडफिल साईट’ (भूमी पुनर्भरण क्षेत्र) कोणत्याही परिस्थितीत १५ मेपूर्वी तयार करा; अन्यथा टोप येथील खणीबाबत वेगळा विचार केला जाईल, असे पुण्यातील हरित लवादाने स्पष्ट केले आहे. मात्र, येथे अशा प्रकारचे क्षेत्र करण्यास राजारामपुरीतील काही कार्यकर्त्यांचा विरोध आहे. यातून गेले आठ ते दहा दिवस हे काम बंद आहे. सोमवारी (दि. २०) हे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. यावेळी विरोध झाल्यास सोमवारनंतर राजारामपुरी परिसरातील कचरा उठाव बंद केला जाईल, असा इशारा उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.टाकाळा येथील ११८०/क या ३.२४ आर क्षेत्रातील खणीची जागा बगीचासाठी आरक्षित करण्यात आली आहे. परंतु, त्यापूर्वी याठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून झूम येथील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून तो कचरा टाकून खण भरण्याची योजना आहे. या खणीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी थेट कचरा न टाकता फक्त झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून उर्वरित ‘रॉ मटेरिअल’च टाकण्याचे बंधन प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातले आहे. खणीत सध्या असणारे पाणी व जलपर्णी हटवून सभोवती मोठी भिंतही उभारली आहे. अद्याप ५० टक्के भिंत उभारणीचे काम बाकी आहे. दरम्यान, टाकाळा खणीत कचरा टाकण्यास सुरुवात झाल्यानंतरच कचऱ्याच्या प्रश्नातून मुक्तीकडे शहराचे पाऊल पडणार आहे. झूममधील कचरा हटविल्यानंतर याठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र, टाकाळा खणीतील योजनेस आंदोलकांमुळे उशीर होत आहे. महापालिकेने थेट कचरा टाकल्यानंतर विरोध करणे योग्य आहे. १० वर्षे जुन्या कचऱ्यातील चाळून झालेले घटक वेगळे केल्यानंतर ते या खणीत टाकले जाणार असल्याने विरोध चुकीचा असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘एमपीसीबी’च्या निकषानुसारच कचरा टाकणारलँडफिल्ड साईटचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाल्यानंतर होणारा विरोध अनाकलनीय आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) घालून दिलेल्या अटी व निकषानुसार येथे ‘झूम’मधील कचरा टाकला जाणार आहे. असे असताना निव्वळ जर-तरच्या निकषानुसार विरोध चुकीचा असल्याचे उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी सांगितले.शास्त्रीय पद्धतीचा वापरखण स्वच्छ केल्यानंतर जमिनीवर प्रदूषण नियंत्रण कायद्याने घालून दिलेल्या निकषांनुसारच शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे घटक बुजविले जाणार आहेत. खणीच्या तळाकडील भागात जाड प्लास्टिकचा थर अंथरला जाणार आहे. यानंतर काही थर कचरासदृश पदार्थ टाकून यावर माती व मुरूम टाकला जाणार आहे. अशा पद्धतीने थर तयार करीतच ही खण बुजविली जाणार असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.मागील अनुभव पाहता महापालिका या खणीत प्रक्रिया न करताच कचरा टाकण्याची शक्यता आहे. खण परिसरात १०८ झोपड्या व तीन मोठ्या रुग्णालयांसह दाट लोकवस्ती आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रक्रिया केलेलाच कचरा टाकणार असल्याची ठाम ग्वाही प्रशासन देत नसल्याने विरोध करीत आहे. विरोधाला विरोध म्हणून नाही. - दुर्गेश लिंग्रस, शिवसेना शहरप्रमुख