शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

मुनिश्वरांकडून धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा

By admin | Updated: July 4, 2017 01:13 IST

मुनिश्वरांकडून धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा

 लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर छत्रपती संभाजीराजे दुसरे यांनी अंबाबाई मंदिराच्या व्यवस्थापनेची जबाबदारी रामचंद्र भट प्रधान यांना दिली आणि त्यासाठी जमिनीही इनाम दिल्या. त्यांचे दत्तकनातू भालचंद्र प्रधान हे अज्ञान असल्याचा फायदा घेत मुनिश्वरांनी धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा घेतला, अशी माहिती धर्मतत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. देसाई यांनी शंभूराजे यांच्या काळातील तीन सनदा, मंदिराचे जाप्तेबुक या पुराव्यांनिशी माहिती दिली. ते म्हणाले, शंभूराजे छत्रपती यांची सन १८४६ च्या सनद क्रमांक ९४७ अनुक्रमांक ८६ नुसार नरहरी भट-सांगावकर तसेच शिदोजी हिंदुराव घोरपडे यांना ‘श्रीं’च्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेसंबंधीची सनद दिली होती. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी गावेही इनाम दिली. या सनदांवर ‘वहिवाटदार’ म्हणून ‘रामचंद्र भट प्रधान’ यांचा उल्लेख आहे. त्यांचा मुलगा श्रीपाद सखाराम प्रधान यांना मूल नव्हते म्हणून त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी भाचीचा मुलगा भालचंद्र याला सन १९५४ मध्ये दत्तक घेतले. त्यावेळी भालचंद्र हे केवळ सात वर्षांचे होते. दत्तक विधानानंतर पंधरा दिवसांतच प्रधान वारले आणि भालचंद्र प्रधान अज्ञान असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिराचे व्यवस्थापन सुरू होते. या सगळ््यांचा फायदा घेत मुनिश्वरांनी आपल्याला सोयीस्कर असा निकाल लावून घेतला. भालचंद्र प्रधान सज्ञान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पूजेचे अधिकार मागितले. मात्र, मुनिश्वरांनी त्यांना दाद लागू दिली नाही. अनेक वर्षे न्यायालयात जाऊनही दाद मिळेना आणि आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाल्याने त्यांनी या विषयाचा नादच सोडला. भालचंद्र प्रधान वयोवृद्ध आहेत. शंभूराजेंच्या काळातही मंदिरातील संपत्तीची रोजनिशी लिहिली जात होती. सन १८६६ च्या श्री करवीरनिवासिनीच्या जाप्तेबुकमध्ये मंदिरात देवीला अर्पण होणाऱ्या साड्या, खण, नारळ, अलंकार या सगळ्यांची नोंद केली जात होती. या नोंदी रामचंद्र भट प्रधान हे सहीनिशी हुजूर सरकारला सादर करत होते. ही संपत्ती त्याकाळीही सरकारच्या खजिन्यात जमा होत होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, सद्य:स्थितीत अंबाबाई मंदिरात किती पुजारी आहेत, त्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांकासहित माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावी.विजय देवणे म्हणाले, संघर्ष समितीतर्फे महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती अशा ठिकाणी निवेदन देऊन अंबाबाई मंदिरातून पुजारी हटविण्यासंबंधीचे ठराव करावेत, तसेच आमदार व खासदारांनी आपआपल्या सभागृहांत हा प्रश्न उपस्थित करावा. वसंतराव मुळीक म्हणाले, मंदिरातील पुजाऱ्यांची कुठेच नोंद नाही, त्यांच्याकडून मदतनीस म्हणून कोणत्याही माणसाला गाभाऱ्यात नेले जाते, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. ‘करवीर निवासिनी’ आणि ‘अंबाबाई’चा उल्लेख देसाई म्हणाले, भालचंद्र प्रधान यांना मी दोन दिवसांपूर्वी भेटून आलो. त्यांनीदेखील या देवीचे स्वरूप दुर्गेचे असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या काळापासून देण्यात आलेल्या सनदांमध्ये देवीचा उल्लेख ‘करवीर निवासिनी’ असा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ८ नोव्हेंबर १९४९ व दि. १४ जानेवारी १९५० मध्ये दिलेल्या पत्रांमध्ये मात्र ‘श्री अंबाबाई टेंपल’ असा उल्लेख आहे. त्यातसुद्धा ‘वहिवाटदार’ म्हणून प्रधान यांचाच उल्लेख आहे. उद्या पुरावे सादर करणार देवणे म्हणाले, तमिळनाडू, पंजाब, नेपाळमधील मंदिरातून खासगी पुजाऱ्यांना हटवून ‘सरकारी पुजारी’ नेमण्यात आले आहेत. कोल्हापुरातील जनरेटा म्हणून शासनाने हा निर्णय घ्यावा, यासाठी सर्व धार्मिक व ऐतिहासिक पुरावे उद्या, बुधवारी सादर करणार आहोत. देसाई म्हणाले, हा निर्णय होईपर्यंत शासनाने आपल्या अधिकारात पुजारी हटवून मंदिरातील सर्व उत्पन्न न्यायालयीन कस्टडीत द्यावे.