शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार, बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा

By admin | Updated: April 23, 2015 01:04 IST

तमदलगे-अंकली चौपदरीकरण रस्ता : रस्त्यामुळे नागरिकांना सोसाव्या लागताहेत मरणयातना; लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या रस्ताप्रश्नी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर या भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. घरांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, रस्त्याचे अर्धवट काम, निमशिरगावच्या पर्यायी शाळेचे नियोजन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी कुचकामी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. केवळ वेळकाढूपणा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. गेली तीन वर्षे या रस्त्यावरून नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. लोकप्रतिनिधींनाया प्रश्नाचे कसलेही सोयरसुतक नाही, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या.दरम्यान, निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील कुमार व कन्या विद्यामंदिर या दोन्ही शाळांच्या इमारती चौपदरीकरणांतर्गत जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी बांधकामाचा निर्णय झालेला नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या इमारतीचे पर्यायी जागेत बांधकाम करून देणे गरजेचे आहे. पर्यायी जागा मोजणीबाबतचा प्रस्ताव भूमापन कार्यालयात प्रलंबित आहे. येत्या जूनमध्ये शाळा भरवायची कोठे, हा प्रश्न गंभीर बनला असून, याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा २७ मे २०१५ला ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्यावतीने जुन्या सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)निमशिरगावमध्ये काम थांबविलेया शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम रस्त्यासाठी नेण्यात आला, त्या मुरुमाऐवजी माती टाकण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना माती मिळालेली नाही. या कारणातून निमशिरगाव ग्रामपंचायतीने गावातील रस्त्याचे काम थांबविले आहे. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, शाळा इमारतीचे बांधकाम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.सुप्रिम कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी देऊनही या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. केवळ हुकूमशाही पद्धतीने चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. आधी लोकांना पर्यायी जागा द्या, मगच रस्ता करा, अन्यथा आंदोलन करू.- सुरेश कांबळे, दानोळी जि. प. सदस्यदुपदरीकरण रस्ता करीत असताना रस्त्याचे नियोजन शून्य झाले आहे. वास्तविक रस्ता तयार करीत असताना रस्त्याची एक बाजू तयार केल्यानंतरच दुसरी बाजू उखडणे गरजेचे होते. मात्र, याठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. खासदार, आमदार या प्रश्नाकडे लक्ष देणार का ?- नीळकंठ राजमाने, जैनापूर ग्रामस्थशासनाकडून शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यात येणारी शेतजमीन, घरे यांना कवडीमोल दराने मोबदला दिला जात आहे. शासनाने भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे कसलेच सोयरसुतक नाही. - विक्रम पाटील, जैनापूर ग्रामस्थतमदलगे येथे सुमारे ३५ घरांचा प्रश्न न सुटल्यामुळे या लोकांनी जायचे कोठे? हा प्रश्न गंभीर आहे. केवळ सातबारा पत्रकी भूमी अधिग्रहण करून अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मेळ घातला आहे. पर्यायी जागा दिल्यानंतरच घरे सोडण्यात येतील. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्र्यांना भेटणार आहे.- पिरगोंडा पाटील, सरपंच, तमदलगेचिपरी-जैनापूर खराब रस्त्याबाबत सुप्रिम कंपनीकडे माहिती घेतली असता, हा रस्ता आमच्याकडे अजून वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता चौपदरीकरणांतर्गत हा रस्ता होणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीकडून आम्हाला मुरूम टाकण्यात अडचणी होत आहेत. खासदार व आमदार यांच्याकडेही हा प्रश्न मांडला आहे. - सुदर्शन पाटील, चिपरी, सरपंच