शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ठेकेदार, बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा

By admin | Updated: April 23, 2015 01:04 IST

तमदलगे-अंकली चौपदरीकरण रस्ता : रस्त्यामुळे नागरिकांना सोसाव्या लागताहेत मरणयातना; लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या रस्ताप्रश्नी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर या भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. घरांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, रस्त्याचे अर्धवट काम, निमशिरगावच्या पर्यायी शाळेचे नियोजन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी कुचकामी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. केवळ वेळकाढूपणा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. गेली तीन वर्षे या रस्त्यावरून नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. लोकप्रतिनिधींनाया प्रश्नाचे कसलेही सोयरसुतक नाही, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या.दरम्यान, निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील कुमार व कन्या विद्यामंदिर या दोन्ही शाळांच्या इमारती चौपदरीकरणांतर्गत जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी बांधकामाचा निर्णय झालेला नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुमारे चारशे विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या इमारतीचे पर्यायी जागेत बांधकाम करून देणे गरजेचे आहे. पर्यायी जागा मोजणीबाबतचा प्रस्ताव भूमापन कार्यालयात प्रलंबित आहे. येत्या जूनमध्ये शाळा भरवायची कोठे, हा प्रश्न गंभीर बनला असून, याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा २७ मे २०१५ला ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्यावतीने जुन्या सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)निमशिरगावमध्ये काम थांबविलेया शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम रस्त्यासाठी नेण्यात आला, त्या मुरुमाऐवजी माती टाकण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना माती मिळालेली नाही. या कारणातून निमशिरगाव ग्रामपंचायतीने गावातील रस्त्याचे काम थांबविले आहे. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, शाळा इमारतीचे बांधकाम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.सुप्रिम कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी देऊनही या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. केवळ हुकूमशाही पद्धतीने चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. आधी लोकांना पर्यायी जागा द्या, मगच रस्ता करा, अन्यथा आंदोलन करू.- सुरेश कांबळे, दानोळी जि. प. सदस्यदुपदरीकरण रस्ता करीत असताना रस्त्याचे नियोजन शून्य झाले आहे. वास्तविक रस्ता तयार करीत असताना रस्त्याची एक बाजू तयार केल्यानंतरच दुसरी बाजू उखडणे गरजेचे होते. मात्र, याठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. खासदार, आमदार या प्रश्नाकडे लक्ष देणार का ?- नीळकंठ राजमाने, जैनापूर ग्रामस्थशासनाकडून शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यात येणारी शेतजमीन, घरे यांना कवडीमोल दराने मोबदला दिला जात आहे. शासनाने भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे कसलेच सोयरसुतक नाही. - विक्रम पाटील, जैनापूर ग्रामस्थतमदलगे येथे सुमारे ३५ घरांचा प्रश्न न सुटल्यामुळे या लोकांनी जायचे कोठे? हा प्रश्न गंभीर आहे. केवळ सातबारा पत्रकी भूमी अधिग्रहण करून अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मेळ घातला आहे. पर्यायी जागा दिल्यानंतरच घरे सोडण्यात येतील. याबाबत लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्र्यांना भेटणार आहे.- पिरगोंडा पाटील, सरपंच, तमदलगेचिपरी-जैनापूर खराब रस्त्याबाबत सुप्रिम कंपनीकडे माहिती घेतली असता, हा रस्ता आमच्याकडे अजून वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता चौपदरीकरणांतर्गत हा रस्ता होणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीकडून आम्हाला मुरूम टाकण्यात अडचणी होत आहेत. खासदार व आमदार यांच्याकडेही हा प्रश्न मांडला आहे. - सुदर्शन पाटील, चिपरी, सरपंच