शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

वंचित कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू

By admin | Updated: August 9, 2014 00:31 IST

अन्नसुरक्षा योजना : इचलकरंजीत सदोष लाभार्थी यादीमुळे धान्याचे गौडबंगाल

इचलकरंजी : सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहिलेल्या शहरातील हजारो लाभार्थी कुटुंबीयांचे सर्वेक्षण शहर कॉँग्रेस समितीने सुरू केले आहे. अनेक भागांतून होणाऱ्या सर्वेक्षणामध्ये लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे काम चालू आहे; पण गेली सहा महिने येथील रास्त भावाच्या धान्य दुकानांतून सदोष यादीप्रमाणे दिलेल्या धान्याचे गौडबंगाल उघडकीस आणण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.अन्नसुरक्षा योजनेंतर्गत फेब्रुवारीमध्ये लाभार्थ्यांची यादी करण्यात आली; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मार्च महिन्यामध्ये पुन्हा फेर यादी केली. ही यादी करताना पुरवठा अधिकारी कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांऐवजी लाभार्थ्यांच्या यादीची जबाबदारी संबंधित दुकानदारांकडेच देण्यात आली होती; पण बहुतांश दुकानदारांनी शिधापत्रिकांवरील धान्य न उचलणाऱ्या अनेकांची नावे यादीत घुसडली. ज्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे ३० टक्के धान्याचा अपहार झाला असावा, अशी नागरिकांत चर्चा आहे.दरम्यानच्या काळात फेब्रुवारी महिन्यातच केसरी शिधापत्रिकांवर सन २०१३ प्रमाणे धान्य द्यावे, असे शासनाकडून आदेश आले. त्यापाठोपाठ फेर आदेश काढण्यात आला आणि सन १९११ प्रमाणे धान्य देण्याचे सुचविण्यात आले. या गोंधळामध्ये प्रत्यक्ष २५ टक्के लाभार्थ्यांना मात्र धान्य मिळालेच नाही. त्याचा परिणाम म्हणून शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलने करून जोरदार आक्षेप घेतला. शहरातील शहर कॉँग्रेसनेही याबाबत सातत्याने पाठपुरावा करून लाभार्थ्यांची यादी मिळविली आणि यादी सदोष असल्याचे वस्तुस्थिती समोर आली. म्हणूनच शहर कॉँग्रेसच्यावतीने प्रत्यक्ष लाभार्थ्यांना धान्य मिळावे, यादृष्टीने सध्याचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी दिली. सर्वेक्षणाची सुरुवात नगरसेवक संजय केंगार, भरत देसाई, दशरथ मोहिते, बापूसाहेब घुले, आदींनी सहकारनगर परिसरातून केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी सुमारे २५० नागरिकांचे अर्ज भरून घेतले. शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये अन्नसुरक्षा योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणे सुरू असून, नागरिकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कॉँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)