शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या खिशातून उत्पादकांच्या पदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ने दूध उत्पादकांना दोन व एक रुपया दरवाढ करत असताना ग्राहकांच्या खिशातून मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ने दूध उत्पादकांना दोन व एक रुपया दरवाढ करत असताना ग्राहकांच्या खिशातून मात्र दोन रुपये काढून घेतले आहेत. गेल्या दोन महिन्यांत काटकसरीचा कारभार करत कोट्यवधी रुपयांची बचत केल्याचे संचालक सांगत होते. ग्राहकांच्या माथी न मारता केवळ काटकससरीच्या माध्यमातून उत्पादकांना दोन रुपये जादा देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांकडून घेऊन उत्पादकांना दिले यामध्येही गाय दूध उत्पादकांबाबत दुजाभाव केला आहे.

‘गोकूळ’मधील मनमानी कारभाराविरोधात रान उठवत नेत्यांनी सत्तांतर घडवले. सत्तेवर आल्यानंतर काटकसरीचा कारभार करत उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे वचन दिले होते. नवीन संचालकांनी काटकसरीचा कारभार करत अनेक बचतीचे निर्णय घेतले. कोट्यवधी रुपयांची बचत केल्याने दूध उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. याबाबत उत्पादकांकडून दरवाढीची विचारणाही होऊ लागली. मात्र लगेच निर्णय घेता येणार नसल्याचे नेत्यांनी सांगितले. तोपर्यंत ‘अमूल’ने विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘गोकूळ’नेही दरवाढीबाबत विचार सुरू केला. विक्री दरात दोन रुपयांची वाढ करून तेच दूध उत्पादकांना देण्यात आले. ग्राहकांच्या खिशातून काढून उत्पादकांच्या पदरात टाकले, यामध्ये ‘गोकूळ’ने काय केले. उलट गाय दूध ग्राहकांकडून दोन रुपये घेतले आणि उत्पादकाला मात्र रुपयाच दिला. असा दुजाभाव केला तर एकट्या म्हैस दूध वाढवून वीस लाख लिटरचा टप्पा तीन वर्षांत सोडाच दहा वर्षांतही गाठता येणार नाही, हे निश्चित आहे.

फुलाच्या पायघड्या घालून नेत्यांचे स्वागत

‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दूध दरवाढीची घोषणा संघाच्या नेत्यांनी केली. त्याचबरोबर नेत्यांच्या स्वागतासाठी ताराबाई पार्क कार्यालयाच्या पायऱ्यांवर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. औक्षण करून नेते पत्रकार परिषदेसाठी आले, याची चर्चा ‘गोकूळ’ वर्तुळात जोरात सुरू होती.

दोन महिन्यांत दोन वेळा बदली

‘गोकूळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. एका अधिकाऱ्याची दोन महिन्यांपूर्वी ताराबाई पार्कातून दूध संकलन विभागात केली. तिथे स्थिरस्थावर होते न होते तोपर्यंत मुंबईला बदली केली. राजकीय द्वेषातून बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.