शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

विकासाच्या गारुडाखाली हिंदू राष्ट्राची बांधणी

By admin | Updated: May 29, 2015 23:49 IST

किशोर बेडकीहाळ : शमशुद्दीन मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : आपण निर्बुद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या अंधारयुगात प्रवेश केला आहे. जिथे राज्यघटनेशी विसंगत बाबींना प्रतिष्ठा मिळत आहे. विकास नावाच्या गारूडाखाली हिंदू राष्ट्र आणि मतांची बांधणी करणाऱ्या हुकुमशाहीचा हा उत्कर्षाचा काळ आहे. येथे आपल्यापुढे प्रश्न न विचारता जे घडतंय त्याला मूकसंमती देण्याला पर्याय नाही कारण हिंदुत्वाचा राजकीय शक्ती म्हणून वापर होत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीवर टीका केली. शाहू स्मारक भवनात गुरुवारी भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने बागल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार देण्यातआला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अ‍ॅड. अशोकराव साळोखे अध्यक्षस्थानी होते. शाल, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये पाच हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेडकीहाळ म्हणाले, हिंदुत्वाच्या हुकूमशाहीची मुळे मुसोलिनी, हिटलर आणि त्यानंतर इस्रायलमधील समाज जीवनाखाली दडली आहेत. जिथे अल्पसंख्याकांना जगण्याचा हक्कच नाकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्ही किती चांगले आहोत हे जगभर सांगत फिरत आहेत. शमशुद्दीन मुश्रीफ म्हणाले, पूर्वीच्या काळीही जातीय दंगली व्हायच्या, पण त्याचे स्वरूप तत्कालीन असायचे. १८५० नंतर मात्र बहुजन समाजाला जातीयवाद्यांमुळे आपले दमन होत असल्याची जाणीव होऊ लागली. १८९०मध्ये समाजक्रांतीच होईल, अशी परिस्थिती होती. अशा काळात जातीयवाद्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बहुजन समाजाला मुस्लिमांच्या मागे लावले. त्यामुळे जातीयवाद्यांवरील लक्ष विचलित झाले. या परिवर्तनवादी चळवळीला स्वातंत्र्यसंग्रामामुळे ब्रेक लागला. (प्रतिनिधी) ‘लोकमान्य’ पदवी का दिली?या व्याख्यानात दोन्ही वक्त्यांनी लोकमान्य टिळक आणि ‘केसरी’वर सडकून टीका केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ अशी टिळकांनी घोषणा केली असली, तरी त्यांना अभिप्रेत असलेले स्वराज्य वेगळे होते. टिळकांनी नेहमी जातीयवाद्यांचा पुरस्कार केला. बहुजन आणि स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्या टिळकांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिलीच कशी ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.