शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:24 IST

कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत.

ठळक मुद्देबांधकाम सभापतींना स्वतंत्र कक्षच नाही

गणपती कोळी।कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यांना स्वतंत्र कक्ष मिळालेले नाहीत. सहा महिन्यांपासून बांधकाम विभागाकडील कनिष्ठ अभियंतापद प्रभारी राहिले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदाला पालिकेने महत्त्वच कमी केले असून, बांधकाम विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच कुरुंदवाडची अवस्था आहे.

पालिका क्षेत्रात बांधकाम विभागाला विशेष महत्त्व असते. या समितीचे केवळ सभापतिपदच नव्हे, तर समिती सदस्य होण्यासाठीही नगरसेवक प्रतिष्ठा पणाला लावतात. शहराची विकासाची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या या विभागात टक्केवारीत व्यवहार चालत असल्याने बांधकाम विभाग मिळण्यासाठी मोठे राजकारण चालते.अशा महत्त्वाच्या खात्याचे येथील पालिकेमध्ये मात्र खच्चीकरणच केले जात असल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या स्थापनेपासून या विभागाच्या सभापतीला स्वतंत्र कक्ष आहेत. शहराच्या बांधकाम विभागासाठी कनिष्ठ अभियंतापद असून, एक स्वतंत्र अधिकारी आहे.

जानेवारीमध्ये समित्या निवडी झाल्या. बांधकाम विभागावरच शहराच्या विकासाचे चित्र ठरू शकते. यामुळे नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अभ्यासू तसेच नवीन विकासाचा दृष्टिकोन व तळमळ असणारे प्रा. सुनील चव्हाण यांना सभापतिपद दिले. त्यांच्यावर जबाबदारी दिल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, पालिका स्थापनेपासून या विभागाला स्वतंत्र कक्ष असताना प्रा. चव्हाण यांना स्वतंत्र कक्ष अद्याप मिळालेला नाही.

या विभागाचे कनिष्ठ अभियंता पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असून, प्रभारी अधिकाºयांवर कारभार चालविला जातो. आठवड्यातून दोन दिवस येणाºया या अधिकाºयांमुळे शहराच्या विकासालाच ‘खो’ बसला आहे. त्यामुळे या विभागाचे महत्त्वच कमी झाले आहे. या पदावर कार्यक्षम सभापती असताना अधिकार आणि अधिकाºयाविना खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा असून, या प्रकाराने पालिकेच्या बांधकाम विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच स्थिती झाली आहे.पूर्णवेळ बांधकाम अभियंत्याची गरजशहराच्या विकासाची अर्थवाहिनी असणाºया बांधकाम विभागाचा दररोज आढावा घेणे, बैठका घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष हवा. तसेच पूर्णवेळ बांधकाम अभियंता असणे गरजेचे आहे. तरच शहराच्या विकासाला गती मिळू शकते.२५ वर्षे बांधकाम सभापतिपदशहराचे माजी नगराध्यक्ष स्व. गणपतराव पोमाजे सलग पंचवीस वर्षे बांधकाम सभापतिपद आपल्याकडे होते. स्वतंत्र कक्षाबरोबर या विभागावर त्यांचा दबदबा होता.त्यामुळे पालिकेचा कोणताही निर्णय यांच्या मान्यतेशिवाय पुढे सरकत नसे. त्यामुळे पालिकेत लोकप्रतिनिधींचे महत्त्व त्यांनी वाढविले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग