शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

छोट्या पक्षांना संपविण्याचा कट, आम आदमी पक्षाची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी अवलंबली जात असलेली त्रिसदस्यीय पध्दत ही संविधानाकडून सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वाचे अधिकार अप्रत्यक्षपणे काढून घेण्याचा प्रकार ...

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी अवलंबली जात असलेली त्रिसदस्यीय पध्दत ही संविधानाकडून सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वाचे अधिकार अप्रत्यक्षपणे काढून घेण्याचा प्रकार आहे, अशा शब्दात आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी टीका केली आहे.

या नव्या पध्दतीमुळे छोटे पक्ष व सर्वसामान्य कार्यकर्ते या निवडणुकीमधून बाहेर फेकले जाणार असून हा प्रस्थापित राजकीय पक्षांचा कट आहे, असा आराेप देसाई यांनी केला आहे.

राज्य सरकारचा हा निर्णय तर्कसंगत वाटत नाही. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी घेतलेला व व्यवहारात पूर्वी भाजपने केलेल्या चौसदस्य रचने प्रमाणेच स्थानिक नागरिकांना ‘आपला कुणीच वाली नाही’ ही भावना निर्माण करणारा ठरू शकतो. महाविकास आघाडीने या पूर्वी एक वॉर्डाचा निर्णय का घेतला? मुंबईला वेगळा निकष का? यामुळे राजकीय हितसंबंधातून हे निर्णय घेतले जाणे लोकशाही व्यवस्थेसाठी निश्चितच चांगले नाही, असे देसाई यांनी म्हटले आहे.

या प्रकारच्या प्रभाग पद्धतीने छोट्या पक्षांच्या, अपक्ष, सामान्य उमेदवारांना भौगोलिक आवाक्यामुळे निवडणुका लढवणे अवघड जाणार आहे. साधने जास्त खर्ची पडत असल्यामुळे निवडणुका फक्त पैश्यावाल्या लोकांकडूनच लढल्या जातील. एका प्रभागात तीन नगरसेवक झाल्याने प्रभागातील कामांना, अडचणींना जबाबदार कोणाला धरायचे याबद्दल साशंकता निर्माण होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.