शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कंजारभाट समाजाच्या बोलीभाषेचे होणार जतन

By admin | Updated: November 5, 2015 00:10 IST

केंद्र सरकारचा कार्यक्रम : माहिती घेऊन केले चित्रीकरण

अतुल आंबी - इचलकरंजी -देशभरातील राज्यांमध्ये विविध समाजामध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने नियोजन कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये इचलकरंजीतील कंजारभाट समाजाच्या बोलीभाषेची माहिती घेऊन चित्रीकरण करण्यात आले आहे. देशाच्या भाषा विभागांमध्ये या बोलीभाषेचे नियमित स्वरुपात जतन करून ठेवण्यात येणार आहे.भारत सरकार गृहमंत्रालय व नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांचे संयुक्तपणे मातृभाषा २०१५ अंतर्गत हे काम सुरू आहे. एक वर्षामध्ये आतापर्यंत ३६ भाषांची माहिती मिळाली असून, २०११ साली झालेल्या बोलीभाषांच्या जनगणनेमध्ये कंजारभाट समाजाच्या भाषेचाही समावेश होता. या भाषेचे लोक संख्येने इचलकरंजीमध्ये जास्त असल्याने येथील त्या समाजातील नागरिकांकडून ही भाषा समजावून घेतली जात आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले पुरूष व स्त्री, तसेच ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे पुरूष व स्त्री यामध्ये अजित मिणेकर, विष्णूपंत नेतले, मोहन नवले, सलोनी मिणेकर, विश्वनाथ माच्छरे, बबिता नवले, शिवानी नवले यांच्याकडून भाषेतील १५५७ शब्द, ५२५ वाक्य घेऊन १२ ते १५ शब्दांची गोष्टही तयार करण्यात येते. त्याचे हिंदी व इंग्रजीमध्ये जतन करून ठेवण्याचे काम सुरू आहे. भविष्यात ही भाषा लोप पावली, तर या समाजातील तरुणांना, तसेच देश-विदेशातील आणखीन काही व्यक्तींना अशा बोलीभाषांचा भविष्यात अभ्यास करता यावा, या उद्देशाने देशातील प्रत्येक राज्यांमध्ये जाऊन तेथील वेगवेगळ्या समाजाच्या बोलीभाषांचे जतन करण्याचे काम या विभागाच्यावतीने सुरू आहे. याबाबत सांख्यिकी अन्वेषक ग्रेड - २ दीपक बाळकृष्ण कामटेकर व प्रकाश नाथ महाडिकही हे काम पाहत आहेत. त्यांना संदीप जेरे, सुभाष देशपांडे, गुंडा हाताळगे, प्रशांत रसाळ या स्थानिकांचे सहकार्य लाभले.मोची, कैकाडी, मांगेरी, वडर, मांदेली, घिताडी, भल्लार अशा भाषांची माहिती घेण्यात आली असून, उर्वरित भाषांचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सर्व बोलीभाषा हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये दुभाजकाच्या सहकार्याने व्हिडीओ चित्रीकरण करून सीडीमध्ये उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहेत. या सीडीमध्ये भाषा बोलणाऱ्याचे हावभाव, कंठातून शब्द फुटताना होणाऱ्या हालचाली याचेही चित्रीकरण स्पष्टपणे दिसून येणार आहे.