शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कर्जमाफीच्या सुधारित निर्णयाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:04 IST

कोल्हापूर : तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने कर्जमाफीचा सुधारित निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या २००८ व २००९ च्या कर्जमाफी योजनेच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या आणि २००१ ते २००९ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.राज्य सरकारने २०१५-१६ मधील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखापर्यंत, तर याच आर्थिक वर्षात नियमित परतफेड करणाºया ...

कोल्हापूर : तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने कर्जमाफीचा सुधारित निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या २००८ व २००९ च्या कर्जमाफी योजनेच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या आणि २००१ ते २००९ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.राज्य सरकारने २०१५-१६ मधील थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखापर्यंत, तर याच आर्थिक वर्षात नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान योजना जाहीर केली. त्यानुसार संबंधित शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले. गेले दहा महिने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. कर्जमाफीच्या निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाशिक येथून शेतकºयांनी संघर्षयात्रा काढली. त्यावेळी २००१ ते २००९ पर्यंत थकीत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा सरकारने केलीहोती; पण महिना झाले तरी त्याबाबतचा निर्णय झाला नव्हता. शेतकºयांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे होत्या.अखेर मंगळवारी मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आला. २००१ ते २००९ पर्यंत थकबाकीदार होते; पण ज्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला नाही, अशा शेतकºयांना याचा फायदा होणार आहे. त्याशिवाय इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस यांसाठी २००१ ते २०१६ या कालावधीत उचल केलेल्या पण थकीत राहिलेल्या कर्जाचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.पुनर्गठित कर्जाचाही समावेशदिनांक १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत वाटप केलेल्या पीककर्जापैकी जून २०१६ पूर्वी किंवा नंतर पुनर्गठित झालेल्या कर्जाचा समावेश या योजनेत केला आहे. पुनर्गठन कर्जाची थकीत रक्कम दीड लाखापेक्षा अधिक असल्यास एकरकमी योजनेनुसार दीड लाखावरील रक्कम जून २०१८ पर्यंत भरल्यास त्यांना दीड लाखापर्यंत लाभ देण्यात येणार आहे.‘त्या’ शेतकºयांचे घोषणापत्र बंधनकारकएप्रिल २००१ ते मार्च २००९ मधील थकबाकीदार शेतकºयांना लाभ देताना त्यांच्याकडून राज्य व केंद्र सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला नाही, असे घोषणापत्र द्यावे लागणार आहे.