शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

स्क्रीनिंग व्यवस्था वाढविण्याचा विचार_-- सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:57 IST

एक कुटुंबप्रमुख जशी घरातील सगळ्यांची काळजी घेतो, तसेच काम पालकमंत्री पाटील यांच्याकडून सध्या सुरू आहे.

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

विश्वास पाटील ।कोल्हापूर : कोरोना संशयित व्यक्तीची तपासणी होऊन जेवढे लवकर लक्षात येईल तेवढा त्याच्यापासून होणारा संसर्ग व वाढणारी रुग्णसंख्या रोखता येईल, म्हणून अशा व्यक्तींचे स्क्रीनिंग कसे लवकरात लवकर होईल असे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातही तातडीने स्वतंत्र नियोजन करीत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रश्न : स्थिती कशी आहे?मंत्री पाटील : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे; परंतु धोका कायम आहे. आपण पुरेशी दक्षता घेणे आवश्यक आहे. सध्या तरी आमचा भर त्यावरच आहे.

प्रश्न : संसर्ग रोखण्यावर भर देण्यासाठी काय करता येईल?मंत्री पाटील : सध्या तरी आम्ही त्यावरच जास्त विचार करीत आहोत; कारण आता पॉझिटिव्ह म्हणून आलेला एक रुग्ण २१ व्या दिवशी तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी अशा संशयित रुग्णांचे स्क्रीनिंग कसे लवकर होईल याची व्यवस्था करण्यावर आता भर दिला जाणार आहे. त्याशिवाय सीपीआरमध्ये येऊन स्राव देण्याची लोकांना भीती वाटते. म्हणून त्याऐवजी महापालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून असा स्राव घेण्याची शहरात व जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही व्यवस्था करता येईल का, असा विचार करीत आहोत. तसे झाले तर लवकर स्राव जातील.

प्रश्न : लॉकडाऊन वाढविल्याने लोकांत अस्वस्थता आहे?मंत्री पाटील : केंद्र व राज्य सरकारकडे प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णांची माहिती रोज जात आहे. आतापर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन होता म्हणून अन्य देशांच्या तुलनेत आपण हा संसर्ग रोखण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे.

‘पालक’मंत्री म्हणून भूमिकापालकमंत्री पाटील हे १५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या संकटकाळात ते यंत्रणा हलवण्याचे काम उत्तम पद्धतीने करीत आहेत. एक कुटुंबप्रमुख जशी घरातील सगळ्यांची काळजी घेतो, तसेच काम पालकमंत्री पाटील यांच्याकडून सध्या सुरू आहे.

मंत्री मुश्रीफ यांच्याशी समन्वयराज्यात जसे मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्थिती हाताळत आहेत, तसेच काम जिल्ह्यात पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याशी त्यांचा उत्तम समन्वय आहे. या संकटाला सामोरे जाताना त्यामुळेच सुलभ होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील