शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पश्चिम घाटाचे संवर्धन मानवी जबाबदारी

By admin | Updated: January 6, 2015 21:52 IST

मधुकर बाचूळकर : संत ज्ञानेश्वर व्याख्यानमाला

उत्तूर : निसर्गावर मानवाने अत्याचार केल्यास निसर्गच कोपतो. म्हणून निसर्गाला त्याच्याप्रमाणे वाढू दिले पाहिजे. जैवविधतेने नटलेल्या वनस्पतींचे संरक्षण, संवर्धन करणे ही जबाबदारी मानवाचीच आहे, असे प्रतिपादन डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षण या विषयावर बोलत होते. संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे यांच्या हस्ते झाले.बाचूळकर म्हणाले, पश्चिम घाटातील प्राणी, भूप्रदेश, वनस्पती, खजिने महत्त्वाची आहेत. घाटातील अनेक प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. वनस्पती तयार होण्यासाठी जितकी वर्षे वेळ लागतो; पण ती नष्ट करावयास जादा वेळ लागत नाही.जागतिक तापमानाचा वेग झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होऊन अनेक देश कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलतोड, हवेचे वाढते प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. वाढत्या जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहे. आता ते आपल्या दारात आले आहे. मानवाचा विकास पर्यावरणावर अवलंबून आहे; पण तो कसा असावा हे आपण सर्वांनी ठरविले पाहिजे. चंदगड, आजरा, सिंधुदुर्ग या भागांत हत्तींचा प्रादुर्भाव, त्याला मिळणाऱ्या पोषक खाद्यामुळे वाढला आहे. याच्याकडे सकारात्मक हत्तींसाठी तो भाग आरक्षित करा, अशी मागणीही पर्यावरतज्ज्ञांनी केली असल्याचे बाचूळकर म्हणाले.पश्चिम घाटात मासे, भूचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, खनिजे, असल्याने ते टिकविणे हे एक आवाहन केले, ते जोपासणे गरजेचे आहे.टी. के. पाटील यांनी स्वागत केले. अतिथी परिचय सदानंद पुंडपळ यांनी केले. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)