शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

सर्व किल्ल्यांचा मास्टर प्लॅन करूनच संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि ...

कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि कोकणासह देश माथ्यावरील पायवाटा, त्यांची आजची स्थिती याचा अभ्यास करून ते संरक्षित करावेत, याचा अंतर्भाव करून सर्वांगीण मास्टर प्लॅन तयार करावा, असा सूर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुर्गप्रेमींकडून दुर्ग संवर्धनाबाबत सूचना मागवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींची भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतली. करवीरनगरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक पन्हाळगडास सिद्धी जोहराने वेढा टाकला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी या वेढ्यातून सुटका केली होती. यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जिवाची बाजी लावली. पावनखिंडीत खिंड लढविली. यासह प्रतापराव गुर्जर समाधी व धारातीर्थी पतन हेही महत्त्वाचे आहे. स्वराज्याच्या दक्षिणेतील पारगड येथे मालुसरेंचे वंशज राहतात, तर उत्तरेकडील विशाळगड देश कोकणापर्यंत जोडला आहे. दुर्ग श्रृंखला विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांना जोडणाऱ्या प्राचीन घाट वाटा आहेत. त्याकाळी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजमार्गच होते. त्यामुळे गडकिल्ल्यांसोबत घेराभोवतालचा विकासही आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने संवर्धन होईल. जल स्वयंपूर्णता दुर्गांकडून

संपूर्ण राज्यातील किल्ल्यावर जलस्रोत आहेत. त्यांची डागडुजी, स्वच्छता केल्यानंतर त्यातील गडाच्या पायथ्याची एक किंवा दोन गावातील पाणीटंचाई दूर होऊ शकते. याचाही विचार संवर्धनात आवश्यक आहे.

जिल्ह्यात तेरा किल्ले

ऐतिहासिक पन्हाळगड, विशाळगड, पावनगड, मुडागड, गगनगड, रांगणा ऊर्फ प्रसिद्धीगड, भुदरगड, शिवगड, गंधर्वगड, महिपालगड, पारगड, कलानिधीगड, सामानगड, अशा तेरा किल्ल्यांचा समावेश आहे.

कोट

सर्व गडकिल्ले संरक्षित करणे गरजेचे आहे. त्या किल्ल्यांची देखभाल करण्याची जबाबदारी निश्चिती करणे, ज्या स्थितीत हे किल्ले आहेत त्याचा अभ्यास करणे, त्याचे डाॅक्युमेंटेशन करणे, किल्ल्याभोवतालच्या पायवाटा, वनसंपदा, दगड, स्थापत्य नमुना, जलस्रोत, लोकसंस्कृती आदींचे जतन करणे आवश्यक आहे. त्यांची डागडुजी आजच्या सिमेंट सळीसारख्या आधुनिक साहित्याने नको. ती त्यावेळी वापरण्यात आलेल्या साहित्यानेच करावी.

- डाॅ. अमर अडके, अध्यक्ष, कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशन.