शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

सर्व किल्ल्यांचा मास्टर प्लॅन करूनच संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि ...

कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि कोकणासह देश माथ्यावरील पायवाटा, त्यांची आजची स्थिती याचा अभ्यास करून ते संरक्षित करावेत, याचा अंतर्भाव करून सर्वांगीण मास्टर प्लॅन तयार करावा, असा सूर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुर्गप्रेमींकडून दुर्ग संवर्धनाबाबत सूचना मागवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींची भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतली. करवीरनगरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक पन्हाळगडास सिद्धी जोहराने वेढा टाकला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी या वेढ्यातून सुटका केली होती. यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जिवाची बाजी लावली. पावनखिंडीत खिंड लढविली. यासह प्रतापराव गुर्जर समाधी व धारातीर्थी पतन हेही महत्त्वाचे आहे. स्वराज्याच्या दक्षिणेतील पारगड येथे मालुसरेंचे वंशज राहतात, तर उत्तरेकडील विशाळगड देश कोकणापर्यंत जोडला आहे. दुर्ग श्रृंखला विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांना जोडणाऱ्या प्राचीन घाट वाटा आहेत. त्याकाळी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजमार्गच होते. त्यामुळे गडकिल्ल्यांसोबत घेराभोवतालचा विकासही आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने संवर्धन होईल. जल स्वयंपूर्णता दुर्गांकडून

संपूर्ण राज्यातील किल्ल्यावर जलस्रोत आहेत. त्यांची डागडुजी, स्वच्छता केल्यानंतर त्यातील गडाच्या पायथ्याची एक किंवा दोन गावातील पाणीटंचाई दूर होऊ शकते. याचाही विचार संवर्धनात आवश्यक आहे.

जिल्ह्यात तेरा किल्ले

ऐतिहासिक पन्हाळगड, विशाळगड, पावनगड, मुडागड, गगनगड, रांगणा ऊर्फ प्रसिद्धीगड, भुदरगड, शिवगड, गंधर्वगड, महिपालगड, पारगड, कलानिधीगड, सामानगड, अशा तेरा किल्ल्यांचा समावेश आहे.

कोट

सर्व गडकिल्ले संरक्षित करणे गरजेचे आहे. त्या किल्ल्यांची देखभाल करण्याची जबाबदारी निश्चिती करणे, ज्या स्थितीत हे किल्ले आहेत त्याचा अभ्यास करणे, त्याचे डाॅक्युमेंटेशन करणे, किल्ल्याभोवतालच्या पायवाटा, वनसंपदा, दगड, स्थापत्य नमुना, जलस्रोत, लोकसंस्कृती आदींचे जतन करणे आवश्यक आहे. त्यांची डागडुजी आजच्या सिमेंट सळीसारख्या आधुनिक साहित्याने नको. ती त्यावेळी वापरण्यात आलेल्या साहित्यानेच करावी.

- डाॅ. अमर अडके, अध्यक्ष, कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशन.