शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सर्व किल्ल्यांचा मास्टर प्लॅन करूनच संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि ...

कोल्हापूर : राज्यातील दुर्ग किल्ल्यांचे संवर्धन हाती घेण्यापूर्वी राज्य शासनाने दुर्ग आणि परिसरातील जैवविविधता, जलस्रोत, स्थानिक वनस्पती, लोकसंस्कृती आणि कोकणासह देश माथ्यावरील पायवाटा, त्यांची आजची स्थिती याचा अभ्यास करून ते संरक्षित करावेत, याचा अंतर्भाव करून सर्वांगीण मास्टर प्लॅन तयार करावा, असा सूर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुर्गप्रेमींकडून दुर्ग संवर्धनाबाबत सूचना मागवल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दुर्गप्रेमींची भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतली. करवीरनगरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक पन्हाळगडास सिद्धी जोहराने वेढा टाकला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी या वेढ्यातून सुटका केली होती. यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जिवाची बाजी लावली. पावनखिंडीत खिंड लढविली. यासह प्रतापराव गुर्जर समाधी व धारातीर्थी पतन हेही महत्त्वाचे आहे. स्वराज्याच्या दक्षिणेतील पारगड येथे मालुसरेंचे वंशज राहतात, तर उत्तरेकडील विशाळगड देश कोकणापर्यंत जोडला आहे. दुर्ग श्रृंखला विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांना जोडणाऱ्या प्राचीन घाट वाटा आहेत. त्याकाळी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजमार्गच होते. त्यामुळे गडकिल्ल्यांसोबत घेराभोवतालचा विकासही आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने संवर्धन होईल. जल स्वयंपूर्णता दुर्गांकडून

संपूर्ण राज्यातील किल्ल्यावर जलस्रोत आहेत. त्यांची डागडुजी, स्वच्छता केल्यानंतर त्यातील गडाच्या पायथ्याची एक किंवा दोन गावातील पाणीटंचाई दूर होऊ शकते. याचाही विचार संवर्धनात आवश्यक आहे.

जिल्ह्यात तेरा किल्ले

ऐतिहासिक पन्हाळगड, विशाळगड, पावनगड, मुडागड, गगनगड, रांगणा ऊर्फ प्रसिद्धीगड, भुदरगड, शिवगड, गंधर्वगड, महिपालगड, पारगड, कलानिधीगड, सामानगड, अशा तेरा किल्ल्यांचा समावेश आहे.

कोट

सर्व गडकिल्ले संरक्षित करणे गरजेचे आहे. त्या किल्ल्यांची देखभाल करण्याची जबाबदारी निश्चिती करणे, ज्या स्थितीत हे किल्ले आहेत त्याचा अभ्यास करणे, त्याचे डाॅक्युमेंटेशन करणे, किल्ल्याभोवतालच्या पायवाटा, वनसंपदा, दगड, स्थापत्य नमुना, जलस्रोत, लोकसंस्कृती आदींचे जतन करणे आवश्यक आहे. त्यांची डागडुजी आजच्या सिमेंट सळीसारख्या आधुनिक साहित्याने नको. ती त्यावेळी वापरण्यात आलेल्या साहित्यानेच करावी.

- डाॅ. अमर अडके, अध्यक्ष, कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशन.