शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

काँग्रेस स्वबळावर लढणार

By admin | Updated: July 26, 2015 23:55 IST

पतंगराव कदम : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणे काळाची गरज

कोल्हापूर : महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे माजी मंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष पतंगराव कदम यांनी रविवारी येथे जाहीर केले. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी नेमलेल्या समन्वय समिती सदस्यांची बैठक रविवारी दुपारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.पतंगराव कदम म्हणाले, गेल्या महापालिका निवडणुकीसाठी समन्वय समितीचा अध्यक्ष मीच होतो. यावेळीही आपल्याकडे जबाबदारी आहे. त्यानुसार आपण या ठिकाणी आलो आहे. गतनिवडणुका आम्ही ताकदीने लढलो; परंतु आमचे काही निर्णय चुकले. सक्षम व निवडून येणाऱ्या उमेदवारांना डावलल्याने त्याचा फटका बसला, असे १२ उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. यावेळी अशी चूक होणार नाही. काँग्रेसमधील गटा-तटांचा विचार न करता, तसेच बारीक-सारीक कांगोरे बाजूला ठेवून सक्षम आणि निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिले जाईल. यासाठी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन, एकत्र बसून निर्णय घेतले जातील. या संदर्भातील बैठक आता महापालिका आरक्षण व प्रभाग रचना झाल्यावरच होईल. पक्ष सध्याच्या घडीला स्वबळावरच लढणार आहे. निवडणुकीवेळी सोबत कोण येईल ते नंतर पाहू. आतापर्यंत तरी कोणीही आघाडी करण्यासंदर्भात विचारणा केलेली नाही.माजी मंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्या भूमिकेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, पाटील व महाडिक यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते कोणती वेगळी भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. सतेज पाटील-महाडिक यांच्या वादामुळे निश्चितच पक्षाचे नुकसान झाले हे नाकारून चालणार नाही. हा वाद मिटविण्यासाठी आपला प्रयत्न यापूर्वीही होता आणि आताही राहील. आपापसांतील मतभेद व गट-तट सोडले तर काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात बळकट आहे.गोंदिया येथील भाजप-काँग्रेस युतीबाबत छेडले असता ते म्हणाले, या ठिकाणी काँग्रेसचा एकच आमदार असून, उर्वरित आमदार, खासदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे ही युती झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा असल्याने याबाबत चर्चा होत आहे; परंतु काँग्रेस पक्षाने स्थानिक आमदार गोपाळ अगरवाल यांना नोटीस काढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही सर्वच ठिकाणी व्हावी, ही आमची भूमिका आहे. ही आघाडी काळाची गरज असून, ‘आघाडी धर्म’ पाळावा लागेल. यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच होईल.यावेळी समिती सदस्य व माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार जयवंतराव आवळे, सत्यजित देशमुख, प्रकाशराव सातपुते, महापौर वैशाली डकरे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, माजी आमदार बजरंग देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नारायण राणेंना ‘त्या’बाबत विचारूकॉँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे ‘मॅनेज’ असल्याची टीका कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली होती. याविषयी विचारल्यावर राणेंना काय अनुभव आला? विरोधी पक्षनेते कसे ‘मॅनेज’ आहेत, हे त्यांना प्रत्यक्ष भेटून नक्की विचारू. प्रदेशाध्यक्षांनी ज्येष्ठ नेत्यांची १५ जणांची समिती नेमली आहे. त्याचे आम्ही दोघे सदस्य असून, या बैठकीत त्याबाबत चर्चाही होईल, असे पतंगराव कदम यांनी सांगितले.सतेज पाटील परदेशातजिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी प्रास्ताविकातच माजी मंत्री सतेज पाटील हे परदेशात असल्याने या ठिकाणी आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच आमदार महाडिक हे काही वेळातच येतील, असे सांगून त्यांच्या गैरहजेरीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.