शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांना न्याय हाच काँग्रेसचा जाहीरनामा

By admin | Updated: October 22, 2015 00:50 IST

ई गव्हर्नन्स, वाय-फाय, सेफ सिटीला प्राधान्य : स्मार्ट सिटी योजनेत समावेश का नाही? सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : शहरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच घटकांना न्याय देणारा काँग्रेस पक्षाचा निवडणूक जाहीरनामा बुधवारी सायंकाळी काँग्रेस कार्यालयात झालेल्या एका छोट्या समारंभात घोषित करण्यात आला. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. आता पुढील पाच वर्षांत ई गव्हर्नन्स तसेच ‘आयटी हब’ला प्राधान्य देण्यात येईल, असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, सुरेश कुराडे, सरलाताई पाटील, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागच्या निवडणुकीतील बहुतांशी सर्वच आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला; परंतु काही कामे ही तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहिली असली, तरी ती पूर्ण करण्याला आमचे प्रथम प्राधान्य असेल, असे सांगून सतेज पाटील यांनी सांगितले की, ‘ई गव्हर्नन्स’ पद्धत राबविण्यामागे शहरातील जनतेला जलद आणि सुलभपणे सेवा मिळवून देण्याचा आमचा हेतू आहे. शहरातील पाच लाख लोक घरबसल्या कामे करू शकतील, असे अ‍ॅप आम्ही आणणार आहोत. ही योजना पूर्ण करण्यास पुढचे एक वर्ष जाईल; पण त्यानंतर मात्र जनतेचा त्रास कमी होईल. देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे, आता कोल्हापूरच्या विकासासाठी निधी आणू, असा भाजपचा दावा आहे, याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले की, हा भाजपचा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न आहे. जर त्यांची सत्ता महापालिकेवर आली नाही, तर विकासाला निधी देणार नाहीत का, हे भाजपने आधी सांगावे. सत्ता कोणाचीही असली तरी पक्षीय अभिनिवेश बाळगता कामा नये. काँग्रेसची देशात व राज्यात सत्तेवर असताना भाजप, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अनेक महापालिकांना निधी दिला होता, हे त्यांनी लक्षात घ्यावे. गेल्या वर्षभरात राज्यात तर त्या आधीपासून केंद्रात सत्ता आहे. मग पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी का भरपूर निधी आणला नाही. ‘स्मार्ट सिटी’त समावेश होण्यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत, असा सवाल उपस्थित करत, निवडणुकीत आम्ही १२०० कोटींचा निधी आणला, याची चर्चा होणार म्हटल्यावर पालकमंत्र्यांनी २० कोटींचा निधी आणला; परंतु वर्ष-दीड वर्षांत भरपूर काही करता येण्यासारखे होते, भाजपने काहीच केले नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा थेट पाईप लाईन योजना दोन वर्षांत पूर्ण करणार ‘ई गव्हर्नन्स’च्या माध्यमातून सर्वप्रकारची बिले आॅनलाईन भरण्याची सुविधा देणारनागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरीता मोबाईल अ‍ॅप तयार करणार. प्रस्तावित गावांतील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार. कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी पाठपुरावा करणार. ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. शाहू मिलच्या जागेवर शाहू स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार.गोविंदराव पानसरे यांचे स्मारक उभारणार. पहिल्या सहा महिन्यांतच महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे बांधणार. विविध ठिकाणी फ्लाय ओव्हर बांधणार. ज्येष्ठ नागरिक ांसाठी विरंगुळा केंद्र व के.एम.टी. पासमध्ये सवलत देणार. रंकाळा व कळंबा येथे लहान मुलांसाठी विशेष खेळणी देणार. रंकाळा व कळंबा तलाव प्रदूषणमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणार. टोलमुक्तीसाठी उतरणार : रस्त्यांकडे आमचं दुर्लक्ष झालं खासगीकरणातून रस्ते करण्याचा आमचा हेतू चांगला होता; परंतु आमच्याकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रस्ते प्रक ल्पाचे काम खराब झाले. त्याविरुद्ध आंदोलन झाले. खराब कामाचे पैसे का द्यावेत, हा आमचाही दावा आहे. आता निवडणूक आल्यामुळे भाजप-शिवसेना टोल रद्द करणार, असे सांगत आहेत; परंतु त्यांचा हा फसवा प्रचार आहे; परंतु आता आम्ही नगरसेवकांना घेऊन कायमस्वरूपी टोलमुक्तीसाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.