शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरेगावमध्ये राष्टÑवादी-काँग्रेसमध्ये सरळ लढत-- शिवसेनेत मरगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:33 IST

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खरी लढत ही राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच होणार असल्याचे निश्चित आहे

ठळक मुद्दे ताकद वाढविण्याचा भाजपकडून प्रयत्न; यशासाठी झगडावे लागणार असल्याची स्थिती परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाला आहे, त्यामुळे राष्टÑवादी निर्धास्त .कोरेगाव तालुक्यावर भाजपने चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत केले आहे.

साहिल शहा।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : कोरेगाव तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खरी लढत ही राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच होणार असल्याचे निश्चित आहे. भाजपने ग्रामपंचायतींवर ताबा मिळविण्यासाठी मीशन हाती घेतले असले तरी गावपातळीवर पक्षसंघटन बळकट केले नसल्याने त्यांना यशासाठी झगडावे लागणार आहे. शिवसेनेत पदाधिकारी निवडण्यात अनेकांना डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर असून, पक्षसंघटनेत मरगळ आली आहे.

कोरेगाव तालुक्याचा विस्तार दक्षिणोत्तर असून, तिन्ही विभागांतील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यावर यापूर्वी काँग्रेसचेच वर्चस्व होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्टÑवादी काँग्रेसने तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील ते कायम राहिले आहे.एकंदरीत आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षसंघटना बळकट करीत असताना ग्रामीण भाग सातत्याने पिंजून काढत लोकांशी थेट संपर्क ठेवला असल्याने राष्टÑवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणे अशक्य नाही. जिल्हापरिषद व पंचायत समितीत सत्ता असल्याने त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाला आहे, त्यामुळे राष्टÑवादी निर्धास्त आहे.

काँग्रेसमध्ये चैतन्य नसल्याने ग्रामीण भागातील घडी विस्कटली आहे. पक्षसंघटना आणि पदाधिकाºयांमध्ये अपेक्षित असा समन्वय नसल्याने पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींचे तालुक्यावर लक्ष होते. मात्र,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यशमिळाले नसल्याने नेतेमंडळीदेखील दुर्लक्ष करीत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार होताना दिसत आहे.कोरेगाव तालुक्यावर भाजपने चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत केले आहे.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर तालुक्यावर विशेष प्रेम दाखविले आहे. त्यांनी नुकताच दौरा करून अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाचा कानमंत्र दिला असून, कार्यकर्ते आता चार्ज झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळविता येणार नसले तरी यश मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे, हे निश्चित.अस्तित्व कागदावरच...शिवसेनेचे तालुक्यात अस्तित्व आता कागदावरच राहिले आहे. पक्षसंघटनेत बदल करीत असताना कोरेगाव तालुक्याला डावलण्यात आले आणि अनेक शिवसैनिकांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्टÑ केला. परिणामी पक्ष संघटना डळमळीत झाली आहे. एकूणच पक्षसंघटनेत मरगळ आहे.