शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

कोरेगावमध्ये राष्टÑवादी-काँग्रेसमध्ये सरळ लढत-- शिवसेनेत मरगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:33 IST

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खरी लढत ही राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच होणार असल्याचे निश्चित आहे

ठळक मुद्दे ताकद वाढविण्याचा भाजपकडून प्रयत्न; यशासाठी झगडावे लागणार असल्याची स्थिती परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाला आहे, त्यामुळे राष्टÑवादी निर्धास्त .कोरेगाव तालुक्यावर भाजपने चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत केले आहे.

साहिल शहा।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : कोरेगाव तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खरी लढत ही राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच होणार असल्याचे निश्चित आहे. भाजपने ग्रामपंचायतींवर ताबा मिळविण्यासाठी मीशन हाती घेतले असले तरी गावपातळीवर पक्षसंघटन बळकट केले नसल्याने त्यांना यशासाठी झगडावे लागणार आहे. शिवसेनेत पदाधिकारी निवडण्यात अनेकांना डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर असून, पक्षसंघटनेत मरगळ आली आहे.

कोरेगाव तालुक्याचा विस्तार दक्षिणोत्तर असून, तिन्ही विभागांतील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यावर यापूर्वी काँग्रेसचेच वर्चस्व होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्टÑवादी काँग्रेसने तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील ते कायम राहिले आहे.एकंदरीत आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षसंघटना बळकट करीत असताना ग्रामीण भाग सातत्याने पिंजून काढत लोकांशी थेट संपर्क ठेवला असल्याने राष्टÑवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणे अशक्य नाही. जिल्हापरिषद व पंचायत समितीत सत्ता असल्याने त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाला आहे, त्यामुळे राष्टÑवादी निर्धास्त आहे.

काँग्रेसमध्ये चैतन्य नसल्याने ग्रामीण भागातील घडी विस्कटली आहे. पक्षसंघटना आणि पदाधिकाºयांमध्ये अपेक्षित असा समन्वय नसल्याने पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींचे तालुक्यावर लक्ष होते. मात्र,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षित यशमिळाले नसल्याने नेतेमंडळीदेखील दुर्लक्ष करीत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार होताना दिसत आहे.कोरेगाव तालुक्यावर भाजपने चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत केले आहे.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर तालुक्यावर विशेष प्रेम दाखविले आहे. त्यांनी नुकताच दौरा करून अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रामीण भागाच्या विकासाचा कानमंत्र दिला असून, कार्यकर्ते आता चार्ज झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळविता येणार नसले तरी यश मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे, हे निश्चित.अस्तित्व कागदावरच...शिवसेनेचे तालुक्यात अस्तित्व आता कागदावरच राहिले आहे. पक्षसंघटनेत बदल करीत असताना कोरेगाव तालुक्याला डावलण्यात आले आणि अनेक शिवसैनिकांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्टÑ केला. परिणामी पक्ष संघटना डळमळीत झाली आहे. एकूणच पक्षसंघटनेत मरगळ आहे.